सिरोंचा : सिरोंचा ते अंकिसा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वरील डांबरी रस्त्यावरचे डांबर पूर्णत: उखडून गेल्याने या महामार्गाला अनेक जागी भेगा पडल्या आहे. महामार्ग पूर्ण होण्याआधीच उखडून खड्ड्यात जमा झाला आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ वरचा रस्ता सिरोंचा ते पातागुडम असा ५७ किलोमीटरचा आहे. सिरोंचा तालुक्यातून या राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही अपूर्णवस्थेत आहे. या महामार्गावरील डांबरीकरणाचे काम २००१ ते २०११ या कालावधीत बीआरओकडून करण्यात आले होते. आता या महामार्गावरचे डांबर पूर्णत: उखडल्या गेले आहे. सिरोंचा ते अंकिसा या भागात जंगल परिसरात या महामार्गाला जागोजागी खड्डे पडले आहेत. या महामार्गावर प्राणहिता व इंंद्रावती या नद्या असून दोन नद्यांवरील पुलाचे कामही अद्याप झालेले नाही. राष्ट्रीय महामार्गाची झालेली ही दुरवस्था दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी करावा, अशी मागणी मागणी सिरोंचावासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग झाला खड्ड्यात जमा
By admin | Updated: February 7, 2015 23:24 IST