शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

मुस्लीम समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध : मोर्चात तीन हजारांवर नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.जिल्हाभरातील मुस्लिम समाजाचे नागरिक सकाळपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात जमले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मुस्लिम समाजाचे नेते भारतीय मुस्लिम परिषदेचे जावेद पाशा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगी झेंडा घेतलेले नागरिक केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात घोषणा देत होते.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख, डॉ.चंदा कोडवते, रोहिदास राऊत, भावना वानखेडे, हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे आदी हजर होते. शासनाने कायद्यात सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.मोर्चाचे नेतृत्व समशेर खान पठाण, वसीम खान पठाण, हाजी इब्राहिम रहमततुला, सय्यद बाबु कादरी, लियाकत सय्यद, मुबारक सय्यद, सोहेब पटेल, एजाज खॉ पठाण, जमीर कुरेशी, जुबेर खान, शहबाद शेख, हामीद शेख, वसीम शेख, बरकत शेख, मुस्ताक शेख, शुजा खान, फारूख शेख, इम्ररान मदनी, शोहेब खान, सर्फराज शेख, इसराईल पठाण, रहिम शेख, इकरार कुरेशी, आपताब खान आबिद सय्यद, हानी समीर सय्यद, सुलेमान लाखानी आदींनी केले.चोख बंदोबस्त, वाहतूकही वळविलीमोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चादरम्यान न्यायालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत चारचाकी वाहने, ट्रकला बंदी घालण्यात आली होती. ही वाहतूक सेमानामार्गे वळविण्यात आली होती. आयटीआय चौक, बाजार चौक, जिल्हा परिषद, सर्कीट हाऊस मार्ग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून व या मार्गाने वाहने येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेदरम्यान या मोर्चासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फूल देऊन सन्मान करण्यात आला.या आहेत मागण्याकेंद्र शासनाने पारित केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे, यामुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून केली. तसेच दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून विद्यापीठातील निर्दोष विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याचाही निषेध करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक