शहरं
Join us  
Trending Stories
1
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
2
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 
3
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
4
ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली
5
त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?
6
दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...
7
WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की
8
'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
9
पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!
10
Health Tips: ५१ व्या वर्षीही गौर गोपाल दास दिसतात फिट; काय असतो साधूंचा डाएट?
11
लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय?
12
बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी
13
४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
14
अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार
15
'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक
16
अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००...
17
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
18
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
19
भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला! 'या' देशांना टाकले मागे, तुम्हीही यादीत आहात का?
20
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा

मुस्लीम समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध : मोर्चात तीन हजारांवर नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.जिल्हाभरातील मुस्लिम समाजाचे नागरिक सकाळपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात जमले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मुस्लिम समाजाचे नेते भारतीय मुस्लिम परिषदेचे जावेद पाशा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगी झेंडा घेतलेले नागरिक केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात घोषणा देत होते.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख, डॉ.चंदा कोडवते, रोहिदास राऊत, भावना वानखेडे, हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे आदी हजर होते. शासनाने कायद्यात सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.मोर्चाचे नेतृत्व समशेर खान पठाण, वसीम खान पठाण, हाजी इब्राहिम रहमततुला, सय्यद बाबु कादरी, लियाकत सय्यद, मुबारक सय्यद, सोहेब पटेल, एजाज खॉ पठाण, जमीर कुरेशी, जुबेर खान, शहबाद शेख, हामीद शेख, वसीम शेख, बरकत शेख, मुस्ताक शेख, शुजा खान, फारूख शेख, इम्ररान मदनी, शोहेब खान, सर्फराज शेख, इसराईल पठाण, रहिम शेख, इकरार कुरेशी, आपताब खान आबिद सय्यद, हानी समीर सय्यद, सुलेमान लाखानी आदींनी केले.चोख बंदोबस्त, वाहतूकही वळविलीमोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चादरम्यान न्यायालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत चारचाकी वाहने, ट्रकला बंदी घालण्यात आली होती. ही वाहतूक सेमानामार्गे वळविण्यात आली होती. आयटीआय चौक, बाजार चौक, जिल्हा परिषद, सर्कीट हाऊस मार्ग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून व या मार्गाने वाहने येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेदरम्यान या मोर्चासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फूल देऊन सन्मान करण्यात आला.या आहेत मागण्याकेंद्र शासनाने पारित केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे, यामुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून केली. तसेच दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून विद्यापीठातील निर्दोष विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याचाही निषेध करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक