शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध : मोर्चात तीन हजारांवर नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा मोर्चा अभूतपूर्व ठरला.जिल्हाभरातील मुस्लिम समाजाचे नागरिक सकाळपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात जमले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मुस्लिम समाजाचे नेते भारतीय मुस्लिम परिषदेचे जावेद पाशा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगी झेंडा घेतलेले नागरिक केंद्र शासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात घोषणा देत होते.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख, डॉ.चंदा कोडवते, रोहिदास राऊत, भावना वानखेडे, हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे आदी हजर होते. शासनाने कायद्यात सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.मोर्चाचे नेतृत्व समशेर खान पठाण, वसीम खान पठाण, हाजी इब्राहिम रहमततुला, सय्यद बाबु कादरी, लियाकत सय्यद, मुबारक सय्यद, सोहेब पटेल, एजाज खॉ पठाण, जमीर कुरेशी, जुबेर खान, शहबाद शेख, हामीद शेख, वसीम शेख, बरकत शेख, मुस्ताक शेख, शुजा खान, फारूख शेख, इम्ररान मदनी, शोहेब खान, सर्फराज शेख, इसराईल पठाण, रहिम शेख, इकरार कुरेशी, आपताब खान आबिद सय्यद, हानी समीर सय्यद, सुलेमान लाखानी आदींनी केले.चोख बंदोबस्त, वाहतूकही वळविलीमोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चादरम्यान न्यायालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत चारचाकी वाहने, ट्रकला बंदी घालण्यात आली होती. ही वाहतूक सेमानामार्गे वळविण्यात आली होती. आयटीआय चौक, बाजार चौक, जिल्हा परिषद, सर्कीट हाऊस मार्ग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून व या मार्गाने वाहने येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेदरम्यान या मोर्चासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फूल देऊन सन्मान करण्यात आला.या आहेत मागण्याकेंद्र शासनाने पारित केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे, यामुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनातून केली. तसेच दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून विद्यापीठातील निर्दोष विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्याचाही निषेध करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक