शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीतून होणार कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 21, 2014 22:52 IST

लोककला व कलावंतांची खाण असलेली झाडीपट्टी रंगभूमी विविध नाटकांच्या माध्यमातून आपले नाव राज्यात गाजवायला सज्ज झाली आहे. दिवाळीपासून मंडई, शंकरपट, यात्रा, गळ यांच्या आयोजनाच्या

शा. मो. बारई - देसाईगंजलोककला व कलावंतांची खाण असलेली झाडीपट्टी रंगभूमी विविध नाटकांच्या माध्यमातून आपले नाव राज्यात गाजवायला सज्ज झाली आहे. दिवाळीपासून मंडई, शंकरपट, यात्रा, गळ यांच्या आयोजनाच्या निमित्ताने प्रत्येक गावात झाडीपट्टींच्या नाटकांची रेलचेल असते. ही रेलचेल सुरू होण्यास आता प्रारंभ होणार आहे. दिवाळीनंतर झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांची खेड्यापाड्यात अधिक मागणी असते. त्यामुळे सहा महिन्यात अडीचशे कोटी रूपयापर्यंत आर्थिक उलाढाल झाडीपट्टी रंगभूमीमार्फत होत असते. झाडीपट्टी रंगभूमीने मुंबईच्या चंदेरी जगालाही मोहित केल्याने चंदेरी दुनियेतील कलावंतांनीही झाडीपट्टी रंगभूमीकडे आपले पाय वळविले आहे. अनेक कलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांमध्येही आपला डेरा बसविला आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये दिवाळीनंतर प्रत्येक गावांमध्ये नाटकाला सुरूवात होत असते. पूर्व विदर्भातील या चार जिल्ह्याच्या भागाला भौगोलिक परिस्थितीमुळे झाडीपट्टी या नावाने संबोधले जाते. झाडीपट्टीतील लोककला व संस्कृतीला १५० ते २०० वर्षाचा इतिहास लाभला आहे. झाडीपट्टी बोलीतून अनेक नाटक रंगमंचावरून तब्बल सहा महिने सादर केले जातात. आॅक्टोबर महिन्यापासून मार्चपर्यंत झाडीपट्टीच्या प्रत्येक गावांमध्ये शंकरपट, गळ, यात्रा, मंडई गावकरी भरवित असतात. त्यानिमित्ताने प्रत्येक गावात एक पेक्षा अधिक नाटक असते. नाटकासह लोककलाही या सहा महिन्यात अनेक गावांमध्ये सादर होतात. यामध्ये दंडार, तमाशा, खडीगंमत, लावणी, दशावतारी आदींचा समावेश आहे. दिवाळीनंतर लोककलांना मंडई व शंकरपटाच्या माध्यमातून उधाण येत असते. झाडीपट्टीच्या अनेक कलावंतांनी केवळ झाडीपट्टीच नव्हे तर मुंबईसह दिल्लीचेही रंगपंच गाजवून आपली पात्रता सिद्ध केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध प्रदेशात तेथील मायबोलीसह विशिष्ट लोककला असल्या तरी सर्वात सरस म्हणून झाडीपट्टीच्या लोककलेकडे पाहिले जाते. त्याला कारणही वेगळेच आहे. झाडीपट्टीतील सर्वात जुनी लोककला म्हणून दंडारीला स्थान आहे. नाटकाचे उगमस्थान दंडारीतूनच झाले, असा कयास आहे व ते सत्यही आहे. दंडारीत वेगवेगळे प्रवेश दाखविले जातात. त्यांना सोंग असे म्हटले जाते. सांगलीत ‘सीता स्वयंवर’ हे नाटक झाले असले तरी झाडीपट्टीत यापूर्वीच सोंगाच्या स्वरूपात अनेक नाटके गाजली. दंडारीतूनच झाडीपट्टीत नाटकांनी जन्म घेतला. मागील १५० वर्षापासून झाडीपट्टीत दंडार केली जात आहे.पूर्वी दिवाळीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत मंडईचा हंगाम असायचा. प्रत्येक गावात नाटक, दंडार नागरिक सादर करायचे. काही ठिकाणी तर दुपारी दंडार व रात्री नाटक असेही समिकरण असायचे. स्थानिक कलावंतांना काम करण्याची संधी दंडार व नाटकाच्या माध्यमातून दिली जायची. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीने अनेक कलावंत घडविले. त्यामुळे झाडीपट्टीला कलावंतांच्या निर्मितीची फॅक्ट्री संबोधले जाते. देसाईगंज येथे ३० ते ४० मंडळांमार्फत गावागावात नाटक सादर केले जात आहे. परंतु सध्य:स्थितीत नाटकात व्यावसायिकपणा आला आहे.