शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

कोरची तालुक्यात महावितरणची सेवा रामभरोसे; ४ वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 17:57 IST

याशिवाय कार्यालयीन कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त आहे. याठिकाणी पूर्णवेळ अभियंत्यांची पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

कोरची (गडचिरोली) : येथील ३३ केव्ही सबस्टेशन असलेल्या वीज वितरण कंपनीमध्ये मागील सहा वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, तर चार वर्षांपासून उपकार्यकारी अभियंता ही पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत तालुक्यातील वीजपुरवठ्याची सेवा रामभरोसे झाली आहे. या पदांची तालुक्यात गरज नाही का? आणि असेल तर ती पदे भरली का जात नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

येथील महावितरणचा कारभार केवळ एका अभियंत्यावर अवलंबून आहे. कार्यालयातील अनेक कामे व फील्डवरील कामे वेळेवर होत नसल्याने अनियमित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे कोरची तालुक्यातील ग्राहकांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरची येथील उपकार्यकारी अभियंत्याचा पदभार सध्या कुरखेडा येथील उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे यांच्याकडे आहे. याशिवाय कार्यालयीन कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त आहे. याठिकाणी पूर्णवेळ अभियंत्यांची पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

काही वर्षांपूर्वी देवरी- चिचगडकडून आलेला वीजपुरवठा सुरळीत राहत होता; परंतु देवरी येथे स्टील कारखाना सुरू झाल्यामुळे कोरचीतील वीजपुरवठा बंद करण्यात आला. कुरखेडावरून आलेली वीजपुरवठ्याची लाइन नऊ किमी जंगलातून आहे. त्यामुळे एकदा वीज खंडित झाली की, २४ तासांच्या आत ती सुरू होत नाही. अशा आणीबाणीच्या वेळी चिचगडवरून वीजपुरवठा करण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे, तरीही चिचगडवरून वीजपुरवठा दिला जात नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहेत.

देखभाल-दुरुस्तीचा निधी गडप?

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून झाडांची कटाई, देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. त्यासाठी महावितरण लाखो रुपये खर्च करीत असते. तरीही थोडा वादळ-वारा आला तरीही वीजपुरवठा बंद केला जातो. जर वीजवाहक तारांची देखभाल दुरुस्ती आधीच केली जाते, तर वीजपुरवठा बंद करण्याची गरज काय? की त्याच्या नावाखाली कंत्राटदार व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार तर करत नाहीत ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांचे सरकारी उत्तर

या समस्यांबाबत गडचिरोली परिमंडळाचे अधीक्षक अभियंता रवींद्र घाडगे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. सध्या ३० जूनपर्यंत कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीवर स्थगिती आहे. लवकरच बाकी समस्या सुटतील. यासह कुरखेडा उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना कोरची उपविभागाचा प्रभार दिला असून त्यांना सदर कामे करण्यास सांगितले आहे, असही ते म्हणाले. 

महिन्याला ३५ ते ४० लाखांचा महसूल

दर महिन्याला कोरची तालुक्यांतील वीज ग्राहकांकडून २० ते २५ लाख रुपये तर एबीस कंपनीकडून १२ लाख रुपये असे एकूण ३५ ते ४० लाख रुपयापर्यंतचे वीज बिल तालुक्यातील वीज ग्राहक दर महिन्याला भरतात. असे असताना ग्राहकांना नियमित वीज पुरवठा मात्र मिळत नाही. अनियमित वीज वसुली मात्र पूर्ण केली जाते. ही एकप्रकारे लूटच असल्याची भावना ग्राहकांमध्ये बळावत आहे.

टॅग्स :electricityवीजgadchiroli-acगडचिरोली