शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चळवळ उभी करणारे साहित्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:14 IST

समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे.

ठळक मुद्देवैशाली डोळस यांचे प्रतिपादन : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे. लढावू वृत्ती दाखविली पाहिजे, असे विचार साहित्यीक वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.फुले आंबेडकर विचार मंच गडचिरोलीच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी वैशाली डोळस या संमेलनाध्यक्ष होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार जोगेंद्र कवाडे, व्ही. डी. मेश्राम, डॉ. सरोज कुथे, डॉ. विजय रामटेके, एमएसईबीचे अभियंता विजय मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. चंद्रशेखर डोंगरवार, बाळकृष्ण बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, प्राचार्य राजकुमार शेंडे, डी. एम. चापले, वनिता बांबोळे, अरूण गजबे, मुनिश्वर बोरकर, गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून अ‍ॅड. राम मेश्राम होते.आमदार विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, जे साहित्य सत्य लपविते. ते साहित्य नाकारले पाहिजे. मी सत्य स्वीकारणारा माणूस आहे. आपण आता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधील वाद संपवून विकासाच्या मार्गाने चालले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन करताना सळसळत्या रक्ताची माणसे पुढे आली पाहिजे. आमच्या वाटेला प्रतीगामी विचाराच्या लोकांनी जाऊ नये. तरूणांनी क्रांती केली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. संचालन पद्मिनी धनविजय तर आभार वनिता बांबोळे यांनी मानले. यावेळी इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. रविवारी अनिरूध्द वनकर यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.