शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

चळवळ उभी करणारे साहित्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:14 IST

समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे.

ठळक मुद्देवैशाली डोळस यांचे प्रतिपादन : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे. लढावू वृत्ती दाखविली पाहिजे, असे विचार साहित्यीक वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.फुले आंबेडकर विचार मंच गडचिरोलीच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी वैशाली डोळस या संमेलनाध्यक्ष होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार जोगेंद्र कवाडे, व्ही. डी. मेश्राम, डॉ. सरोज कुथे, डॉ. विजय रामटेके, एमएसईबीचे अभियंता विजय मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. चंद्रशेखर डोंगरवार, बाळकृष्ण बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, प्राचार्य राजकुमार शेंडे, डी. एम. चापले, वनिता बांबोळे, अरूण गजबे, मुनिश्वर बोरकर, गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून अ‍ॅड. राम मेश्राम होते.आमदार विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, जे साहित्य सत्य लपविते. ते साहित्य नाकारले पाहिजे. मी सत्य स्वीकारणारा माणूस आहे. आपण आता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधील वाद संपवून विकासाच्या मार्गाने चालले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन करताना सळसळत्या रक्ताची माणसे पुढे आली पाहिजे. आमच्या वाटेला प्रतीगामी विचाराच्या लोकांनी जाऊ नये. तरूणांनी क्रांती केली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. संचालन पद्मिनी धनविजय तर आभार वनिता बांबोळे यांनी मानले. यावेळी इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. रविवारी अनिरूध्द वनकर यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.