शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चळवळ उभी करणारे साहित्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:14 IST

समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे.

ठळक मुद्देवैशाली डोळस यांचे प्रतिपादन : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे. लढावू वृत्ती दाखविली पाहिजे, असे विचार साहित्यीक वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.फुले आंबेडकर विचार मंच गडचिरोलीच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी वैशाली डोळस या संमेलनाध्यक्ष होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार जोगेंद्र कवाडे, व्ही. डी. मेश्राम, डॉ. सरोज कुथे, डॉ. विजय रामटेके, एमएसईबीचे अभियंता विजय मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. चंद्रशेखर डोंगरवार, बाळकृष्ण बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, प्राचार्य राजकुमार शेंडे, डी. एम. चापले, वनिता बांबोळे, अरूण गजबे, मुनिश्वर बोरकर, गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून अ‍ॅड. राम मेश्राम होते.आमदार विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, जे साहित्य सत्य लपविते. ते साहित्य नाकारले पाहिजे. मी सत्य स्वीकारणारा माणूस आहे. आपण आता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधील वाद संपवून विकासाच्या मार्गाने चालले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन करताना सळसळत्या रक्ताची माणसे पुढे आली पाहिजे. आमच्या वाटेला प्रतीगामी विचाराच्या लोकांनी जाऊ नये. तरूणांनी क्रांती केली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. संचालन पद्मिनी धनविजय तर आभार वनिता बांबोळे यांनी मानले. यावेळी इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. रविवारी अनिरूध्द वनकर यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.