शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पोटातील बाळासह मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:06 IST

रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली. प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेला शनिवारी रात्रीपासून पोटात दुखणे सुरू झाले.

ठळक मुद्देकार्डावर चुकीची माहिती : रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली (गडचिरोली) : रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली.प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेला शनिवारी रात्रीपासून पोटात दुखणे सुरू झाले. तिला रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथे प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. मात्र कसनसूर येथे प्रसूती करणे शक्य नसल्याने तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला डॉ.विजय साबने यांनी दिला. कसनसूर हे गाव एटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आहे. रुग्णवाहिकेने गरोदर मातेला आणले जात असताना वाटेतच मातेचा मृत्यू झाला. एटापल्ली रुग्णालयात गरोदर मातेला घेऊन रुग्णवाहिका रविवारी सकाळी ८.४५ वाजता पोहोचली. डॉ.कांचन आकरे यांनी तपासणी केल्यानंतर गरोदर मातेला मृत घोषित केले.विशेष म्हणजे बाली उसेंडीला नऊ महिने पूर्ण झाले होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. तर आरोग्य कार्डावर मात्र तिला नववा महिना सुरू असल्याचे लिहिले होते. यावरून गरोदर मातेच्या कार्डवरील तारखा व्यवस्थीत लिहिल्या जात नाही, असे स्पष्ट होत आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोेन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र महिन्यातून १५ दिवस एक डॉक्टर तर १५ दिवस दुसरा डॉक्टर उपस्थित राहतो.वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहित आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आहे.दोन महिन्यात तीन मातांचा मृत्यूवेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने मागील दोन महिन्यात तीन गरोदर माता व बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घडल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन वेगाने चालविणे शक्य होत नाही. परिणामी रुग्ण वेळेवर एटापल्ली येथे पोहोचू शकत नाही. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.विजय साबने हे नेहमीच दारू पिऊन कर्तव्यावर राहतात. रुग्णांची बरोबर तपासणी करीत नाही, असा आरोप कसनसूरचे सरपंच सुनील मडावी व घोटसूरचे सरपंच शिवाजी हेडो यांनी केला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू