शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

ठळक मुद्देअर्थसाहाय्य व कर्ज पुरवठ्याची मागणी : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक नियोजन कोलमडले

रत्नाकर बोमिडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यात शहराबरोबरच खेडेही भरडल्या जात आहेत. कोरोनाचा फटका उद्योगाला बसला. परंतु ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीक घेतले जाते. मात्र आता कोरोनाच्या संचारबंदीने शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काम मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत राहावे लागत आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे काम करता येत नाही, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी, शेतमजूर सापडल्याने त्यांचे आर्थिक नियोजन ढेपाळले आहे.अनेक ठिकाणी कापणीला आलेले कडधान्य तसेच शेवटचा तोडा असलेल्या कापसाची वेचणी केव्हा होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशावेळी शासन व स्वयंसेवी संस्था त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. परंतु केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवून उपयोग नाही तर त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करणे गजेचे आहे. शेतकºयांची कर्जमाफी झाली की नाही, शेतकऱ्यांना तातडीने व पुरेसा कर्जपुरवठा होतो की नाही? शेतकºयाला शेतीपयोगी वस्तू रास्त भावात उपलब्ध होतात की नाही या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.कर्मचारी कोरोनाविरोधात लढत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे अश्रू पुसणे तितकेच महत्त्वाचे आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ पुरवठा न झाल्यास लॉकडाऊन थांबल्यावर शेतकरी, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही.लघु व्यावसायिक व अत्यल्प मानधनावर असणाºयांचे होणार बेहालचामोर्शी, गडचिरोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी असलेल्या दुकानांमध्ये अत्यल्प मानधनावर बरेच युवक काम करतात. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ५० हजार ते १ लाख रुपयांचे भांडवल उभारून छोटे व्यवसाय उभे केले आहेत. कोणी भाड्याची खोली घेऊन, दुकानचाळीत तर कुणी ठेला लावून विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले आहेत. मात्र कोरोना संचारबंदीने गेल्या १५ ते २० दिवसांपासून किराणा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णत: ठप्प पडले आहेत. डेकोरेशन, फुलवारी व इतर व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायात काम करणारे मजूर व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी