शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

ठळक मुद्देअर्थसाहाय्य व कर्ज पुरवठ्याची मागणी : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक नियोजन कोलमडले

रत्नाकर बोमिडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यात शहराबरोबरच खेडेही भरडल्या जात आहेत. कोरोनाचा फटका उद्योगाला बसला. परंतु ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीक घेतले जाते. मात्र आता कोरोनाच्या संचारबंदीने शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काम मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत राहावे लागत आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे काम करता येत नाही, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी, शेतमजूर सापडल्याने त्यांचे आर्थिक नियोजन ढेपाळले आहे.अनेक ठिकाणी कापणीला आलेले कडधान्य तसेच शेवटचा तोडा असलेल्या कापसाची वेचणी केव्हा होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशावेळी शासन व स्वयंसेवी संस्था त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. परंतु केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवून उपयोग नाही तर त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करणे गजेचे आहे. शेतकºयांची कर्जमाफी झाली की नाही, शेतकऱ्यांना तातडीने व पुरेसा कर्जपुरवठा होतो की नाही? शेतकºयाला शेतीपयोगी वस्तू रास्त भावात उपलब्ध होतात की नाही या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.कर्मचारी कोरोनाविरोधात लढत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे अश्रू पुसणे तितकेच महत्त्वाचे आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ पुरवठा न झाल्यास लॉकडाऊन थांबल्यावर शेतकरी, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही.लघु व्यावसायिक व अत्यल्प मानधनावर असणाºयांचे होणार बेहालचामोर्शी, गडचिरोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी असलेल्या दुकानांमध्ये अत्यल्प मानधनावर बरेच युवक काम करतात. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ५० हजार ते १ लाख रुपयांचे भांडवल उभारून छोटे व्यवसाय उभे केले आहेत. कोणी भाड्याची खोली घेऊन, दुकानचाळीत तर कुणी ठेला लावून विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले आहेत. मात्र कोरोना संचारबंदीने गेल्या १५ ते २० दिवसांपासून किराणा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णत: ठप्प पडले आहेत. डेकोरेशन, फुलवारी व इतर व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायात काम करणारे मजूर व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी