शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांना एसटी बसची अजुनहीं सुविधा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:02 IST

७३६ गावांतील नागरिकांना एसटीची सेवा : उर्वरित गावातील लोकांना पायदळ गाठावे लागते तालुकास्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील एकूण १ हजार ६७५ गावांपैकी केवळ ७३६ गावांपर्यंतच एसटीची सुविधा पोहोचली आहे. उर्वरित गावांतील नागरिकांना पायदळ एखादे मोठे गाव गाठावे लागते. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे; मात्र माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावी पायदळ किंवा सायकलने जावे लागते.

देशाच्या विकासात रस्ते व वाहतूक व्यवस्थेचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच प्रत्येक गाव रस्त्याने जोडण्यावर शासन भर देत आहे; मात्र गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांपर्यंत रस्ता बांधणे शक्य नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना पायवाटेचा अधार घेत जगाशी संपर्क साधावा लागतो. पावसाळ्यात तर नाल्यांवरून पाणी राहत असल्याने चार महिने जगाशी संपर्क तुटलेला असते.

एसटी हे सामूहिक वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांपर्यंत एसटीचे जाळे पसरले असावे, अशी अपेक्षा आहे. आपल्या गावापर्यंत एसटी यावी, हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. त्यासाठी ते पाठपुरावाही करतात; मात्र अजूनपर्यंत निम्म्याही गावांपर्यंत एसटी पोहोचू शकली नाही. परिणामी येथील नागरिकांना पायदळ किंवा सायकलने गाव गाठावे लागते. शक्यतो जास्तीत जास्त एसटी पोहोचविण्याची आवश्यकता आहे.

खासगी प्रवासी वाहनेही कमीगडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात खासगी प्रवास वाहनांची संख्या कमी आहे. येथील नागरिकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते दुचाकी खरेदी करू शकत नाहीत. खासगी प्रवाशी वाहनांची संख्यासुद्धा कमी आहे. त्यामुळे सायकल किंवा पायदळ प्रवास केल्याशिवाय पर्याय राहत नाही.

एसटी पोहोचलेल्या गावांची संख्यातालुका                               एकूण गावे                     एसटी सेवादेसाईगंज                                   ३९                                  २६आरमोरी                                    १०३                                ५५कुरखेडा                                    १२८                                ७७कोरची                                       १३३                                ३९धानोरा                                       २२८                                ७१गडचिरोली                                 १२८                                ८१चामोर्शी                                     २०४                                १४५मुलचेरा                                      ६९                                  ४२एटापल्ली                                   १९७                                ४८भामरागड                                  १९८                                २३अहेरी                                        १८४                                 ७०सिरोंचा                                      १४८                                 ५९

एकूण                                    १६८९                             ७३६

मानव विकास मिशनचाही लाभ नाही

विद्यार्थिनींना शाळेपर्यंत प्रवास करण्यासाठी शासनाने अहेरी व गडचिरोली या दोन्ही एसटी आगारांना जवळपास १०० बस उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र याही बस दुर्गम भागातील गावांपर्यंत जात नाहीत. तालुक्यातील मुख्य रस्त्याने धावतात. विशेष करून दुर्गम भागात १० ते १२ किमीपर्यंत माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा नाहीत. विद्यार्थ्यांना तेवढे अंतर पायदळ जावे लागते.

एसटी हे शासनाच्या अखत्यारीत येणारे महामंडळ आहे. त्यामुळे केवळ नफ्यावर जोर न देता नागरिकांना सेवा देण्याचा उद्देश एसटीने बाळगला पाहिजे. प्रत्येक गावापर्यत एसटी पोहोचणे शक्य नाही. मात्र जास्तीत जास्त गावांपर्यंत एसटी सेवा पूरवावी.

- सुमीत करमकर, नागरिक

दुर्गम भागाच्या विकासाकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जास्तीत जास्त गावे एसटीने जोण्यासाठी प्रयत्न करावा. खासगी प्रवाशी वाहनधारक प्रवाशांची प्रचंड लूट करतात. मुख्य मार्गावरही बसची संख्या वाढविण्याची गरज आहे.

- संदीप येनगंटीवार, नागरिक

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीpassengerप्रवासी