शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

कोरोनात 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्च रक्तदाबामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त होते. सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाची भयंकर भिती होती

ठळक मुद्देमधुमेहानेही अनेकांचा गेला जीव; वेळीच उपचाराकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या एकूण मृत्यूपैकी ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबाने झाला आहे.बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती कोरोनापासून सहज मुक्त होत होते. मात्र वयोवृध्द नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होत होती. तालुकास्तरावर असलेल्या बहुतांश रूग्णांना जिल्हास्थळी हलवावे लागत होते. काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त होते. सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाची भयंकर भिती होती. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्त रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा रक्तदाब आणखी वाढत होता. तसेच मधुमेहग्रस्तही कोरोनाचे बळी पडले आहेत.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वयाचे विश्लेषण केल्यास बहुतांश व्यक्ती ६० वर्षांच्या पुढील वयाचे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात जे एकूण मृत्यू झाले, त्यामध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सर्वाधिक कमी वयाचा रूग्ण २२ वर्षांचा असून तो देसाईगंज येथील आहे. वाढत्या वयाबरोबरच अनेक आजार वाढतात. तसेच वयोवृध्द नागरिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने कोरोनापासून धोका होत होता. त्यामुळेच वयावृध्द नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला आरोग्य विभागामार्फत दिला जात होता.मधुमेह आहे, काळजी घ्या !उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह असलेल्या रूग्णांना कोरोनापासून धोका आहे. मधुमेहग्रस्त रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यास त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी कोरोना होणार नाही,यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांनी तत्काळ रूग्णालयात भरती होण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्त रूग्णावर वेळीच उपचार झाल्यास कोरोनापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घेण्याची गरज आहे.रोग लपविल्याने अनेकांचा गेला जीवकोरोनाची लागण होऊनही काही रूग्ण खासगी रूग्णालयातच इतर उपचार करीत होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात ते भरती होत होते. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य