शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

जिल्ह्यातील गावांची पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक

By admin | Updated: April 18, 2015 01:34 IST

५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना टंचाईग्रस्त गावे जाहीर करुन या गावांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला ....

गडचिरोली : ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना टंचाईग्रस्त गावे जाहीर करुन या गावांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने घेतला असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव ५० टक्क्याच्या आत पैसेवारी त दाखविण्यात आलेला नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावे ५० टक्क्याहून कमी पैसेवारी असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विशेष सवलतीपासून मुकण्याची वेळ आली आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला. सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. परिणामी येथील शेतकऱ्यांनी खरीप पीक घेतले नाही. या रबी हंगामातील पिकांचे सर्वेक्षण करुन पैसेवारी जाहीर करण्यात आली. कमी पैसेवारी असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, वीजबिलात ३३.५ टक्के सूट, दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे व टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, अशा आठ सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र यापैकी एकाही सवलतीचा लाभ गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांना मिळणार नाही. यंदाच्या रबी हंगामात इतर जिल्ह्यांप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडला. मात्र सर्वेक्षणाअंती गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दर्शविण्यात आली.राज्य शासनाने राज्यातील सहा प्रशासकीय विभागातील ३९२३ गावांची पैसेवारी जाहीर केली. त्यापैकी १२५३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर २६७० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दर्शविण्यात आली. औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यात ३५६ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्याचा क्रमांक लागला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३९३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यापैकी सर्वच ३९३ गावांची पैसेवारी ५० पैशांपैकी कमी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतींचा लाभ होणार आहे. जालना जिल्ह्यातील ४० पैकी ४० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ११० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. मात्र सर्वच ११० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे. (शहर प्रतिनिधी)