शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गावांची पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक

By admin | Updated: April 18, 2015 01:34 IST

५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना टंचाईग्रस्त गावे जाहीर करुन या गावांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला ....

गडचिरोली : ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना टंचाईग्रस्त गावे जाहीर करुन या गावांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने घेतला असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव ५० टक्क्याच्या आत पैसेवारी त दाखविण्यात आलेला नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावे ५० टक्क्याहून कमी पैसेवारी असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विशेष सवलतीपासून मुकण्याची वेळ आली आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला. सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. परिणामी येथील शेतकऱ्यांनी खरीप पीक घेतले नाही. या रबी हंगामातील पिकांचे सर्वेक्षण करुन पैसेवारी जाहीर करण्यात आली. कमी पैसेवारी असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, वीजबिलात ३३.५ टक्के सूट, दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे व टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, अशा आठ सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र यापैकी एकाही सवलतीचा लाभ गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांना मिळणार नाही. यंदाच्या रबी हंगामात इतर जिल्ह्यांप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडला. मात्र सर्वेक्षणाअंती गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दर्शविण्यात आली.राज्य शासनाने राज्यातील सहा प्रशासकीय विभागातील ३९२३ गावांची पैसेवारी जाहीर केली. त्यापैकी १२५३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, तर २६७० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दर्शविण्यात आली. औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यात ३५६ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्याचा क्रमांक लागला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३९३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यापैकी सर्वच ३९३ गावांची पैसेवारी ५० पैशांपैकी कमी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतींचा लाभ होणार आहे. जालना जिल्ह्यातील ४० पैकी ४० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ११० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. मात्र सर्वच ११० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे. (शहर प्रतिनिधी)