शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास ...

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास जरी ‘वडसा’ असे म्हटले जात असले तरी ते केवळ रेल्वेस्थानकाचे नाव आहे. शहर आणि नगरपरिषदेचे अधिकृत नाव मात्र ‘देसाईगंज’ असे आहे. मूळचे वडसा गाव अजूनही जवळच जुनी वडसा या नावाने टिकून आहे. दुष्काळी आणि पूरग्रस्त खेड्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी वडसा गाव आणि रेल्वेस्थानक यामधील उपलब्ध जागेवर एक लहान वसाहत उभारली. ब्रिटिश सरकारने त्या वसाहतीला त्यांचेच नाव दिले. देसाई यांचे पूर्ण नाव चंदुलाल चुनीलाल देसाई होते. राजदूत असताना फाळणीनंतरही अडकून पडलेल्या ५० हजारांहून अधिक हिंदूना भारतात आणून देसाई यांनी पुनर्वसित केले. स्वातंत्र्यानंतर वडसाजवळील देसाईगंज वसाहत हळूहळू वाढू लागली. १९५८ला तिथे वीज नसतानासुद्धा ७ राईस मिल होत्या. पुढे १९६०च्या २६ जानेवारीला तिथे वीज पाेहाेचली. १९६१ला देसाईगंज वसाहत, जुनी वडसा आणि बाजूचे नैनपूर हे खेडे जोडून नगरपरिषद घोषित करण्यात आली. आजच्याप्रमाणे तेव्हाही काही लोक याविरोधात कोर्टात गेले होते. पण, शेवटी ग्यानचंद दुनिचंद हे देसाईगंजचे पहिले नगराध्यक्ष झाले. १९५१मध्ये देसाईगंजची लाेकसंख्या केवळ १ हजार ८०० हाेती आणि केवळ १० वर्षात १९६१ पर्यंत ११ हजार लोकवस्तीच्या शहरात नगर परिषद अस्तित्त्वात आली. गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर आरमोरी तालुक्यातील व जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद देसाईगंज येथे हाेती. त्यानंतर १९९२ला देसाईगंज तालुका घोषित झाला. देसाईगंज शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सी. सी. देसाई यांचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शहर निर्मितीच्या स्मृती विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पाेहाेचावा, यासाठी येथील अतिक्रमण हटवून सी. सी. देसाई यांच्या स्मृतिस्तंभाचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे.

बाॅक्स

काेण हाेते सी. सी. देसाई?

देसाईगंज हे नाव देणारे सी. सी. देसाई कोण हे दुर्दैवाने आज स्थानिक लोकांनासुद्धा माहीत नाही. कुणी ते मालगुजार, जुने राजकारणी नेते होते असे सांगतात. केवळ ८० ते ९० वर्षांपूर्वी नावारुपाला आलेल्या देसाईगंज शहराच्या स्थापनेचा काळ हा विस्मृतीत गेलेला आहे. १९३३ यावर्षी तत्कालीन चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सी. सी. देसाई यांची नेमणूक झाली. देसाई हे अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी होते. गुजरातच्या भद्रण या गावी २७ एप्रिल १९०० राेजी जन्मलेले देसाई १९२३मध्ये इंग्लंडमध्ये आय. सी. एस. झाले. १९३० आणि १९४०च्या दशकात मध्य प्रांतात विविध पदांवर कार्यरत देसाई पदोन्नतीने पुढे मध्य प्रांताचे मुख्य सचिव झाले. अतिशय प्रतिष्ठित अशा या प्रशासकाची पुढे १९५४ - ५७ दरम्यान भारताचे राजदूत म्हणून श्रीलंका आणि पाकिस्तान येथे रवानगी झाली.

===Photopath===

230421\23gad_6_23042021_30.jpg

===Caption===

अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले सी.सी देसाई यांचे स्मृतिस्तंभ.