शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास ...

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास जरी ‘वडसा’ असे म्हटले जात असले तरी ते केवळ रेल्वेस्थानकाचे नाव आहे. शहर आणि नगरपरिषदेचे अधिकृत नाव मात्र ‘देसाईगंज’ असे आहे. मूळचे वडसा गाव अजूनही जवळच जुनी वडसा या नावाने टिकून आहे. दुष्काळी आणि पूरग्रस्त खेड्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी वडसा गाव आणि रेल्वेस्थानक यामधील उपलब्ध जागेवर एक लहान वसाहत उभारली. ब्रिटिश सरकारने त्या वसाहतीला त्यांचेच नाव दिले. देसाई यांचे पूर्ण नाव चंदुलाल चुनीलाल देसाई होते. राजदूत असताना फाळणीनंतरही अडकून पडलेल्या ५० हजारांहून अधिक हिंदूना भारतात आणून देसाई यांनी पुनर्वसित केले. स्वातंत्र्यानंतर वडसाजवळील देसाईगंज वसाहत हळूहळू वाढू लागली. १९५८ला तिथे वीज नसतानासुद्धा ७ राईस मिल होत्या. पुढे १९६०च्या २६ जानेवारीला तिथे वीज पाेहाेचली. १९६१ला देसाईगंज वसाहत, जुनी वडसा आणि बाजूचे नैनपूर हे खेडे जोडून नगरपरिषद घोषित करण्यात आली. आजच्याप्रमाणे तेव्हाही काही लोक याविरोधात कोर्टात गेले होते. पण, शेवटी ग्यानचंद दुनिचंद हे देसाईगंजचे पहिले नगराध्यक्ष झाले. १९५१मध्ये देसाईगंजची लाेकसंख्या केवळ १ हजार ८०० हाेती आणि केवळ १० वर्षात १९६१ पर्यंत ११ हजार लोकवस्तीच्या शहरात नगर परिषद अस्तित्त्वात आली. गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर आरमोरी तालुक्यातील व जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद देसाईगंज येथे हाेती. त्यानंतर १९९२ला देसाईगंज तालुका घोषित झाला. देसाईगंज शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सी. सी. देसाई यांचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शहर निर्मितीच्या स्मृती विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पाेहाेचावा, यासाठी येथील अतिक्रमण हटवून सी. सी. देसाई यांच्या स्मृतिस्तंभाचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे.

बाॅक्स

काेण हाेते सी. सी. देसाई?

देसाईगंज हे नाव देणारे सी. सी. देसाई कोण हे दुर्दैवाने आज स्थानिक लोकांनासुद्धा माहीत नाही. कुणी ते मालगुजार, जुने राजकारणी नेते होते असे सांगतात. केवळ ८० ते ९० वर्षांपूर्वी नावारुपाला आलेल्या देसाईगंज शहराच्या स्थापनेचा काळ हा विस्मृतीत गेलेला आहे. १९३३ यावर्षी तत्कालीन चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सी. सी. देसाई यांची नेमणूक झाली. देसाई हे अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी होते. गुजरातच्या भद्रण या गावी २७ एप्रिल १९०० राेजी जन्मलेले देसाई १९२३मध्ये इंग्लंडमध्ये आय. सी. एस. झाले. १९३० आणि १९४०च्या दशकात मध्य प्रांतात विविध पदांवर कार्यरत देसाई पदोन्नतीने पुढे मध्य प्रांताचे मुख्य सचिव झाले. अतिशय प्रतिष्ठित अशा या प्रशासकाची पुढे १९५४ - ५७ दरम्यान भारताचे राजदूत म्हणून श्रीलंका आणि पाकिस्तान येथे रवानगी झाली.

===Photopath===

230421\23gad_6_23042021_30.jpg

===Caption===

अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले सी.सी देसाई यांचे स्मृतिस्तंभ.