शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास ...

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास जरी ‘वडसा’ असे म्हटले जात असले तरी ते केवळ रेल्वेस्थानकाचे नाव आहे. शहर आणि नगरपरिषदेचे अधिकृत नाव मात्र ‘देसाईगंज’ असे आहे. मूळचे वडसा गाव अजूनही जवळच जुनी वडसा या नावाने टिकून आहे. दुष्काळी आणि पूरग्रस्त खेड्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी वडसा गाव आणि रेल्वेस्थानक यामधील उपलब्ध जागेवर एक लहान वसाहत उभारली. ब्रिटिश सरकारने त्या वसाहतीला त्यांचेच नाव दिले. देसाई यांचे पूर्ण नाव चंदुलाल चुनीलाल देसाई होते. राजदूत असताना फाळणीनंतरही अडकून पडलेल्या ५० हजारांहून अधिक हिंदूना भारतात आणून देसाई यांनी पुनर्वसित केले. स्वातंत्र्यानंतर वडसाजवळील देसाईगंज वसाहत हळूहळू वाढू लागली. १९५८ला तिथे वीज नसतानासुद्धा ७ राईस मिल होत्या. पुढे १९६०च्या २६ जानेवारीला तिथे वीज पाेहाेचली. १९६१ला देसाईगंज वसाहत, जुनी वडसा आणि बाजूचे नैनपूर हे खेडे जोडून नगरपरिषद घोषित करण्यात आली. आजच्याप्रमाणे तेव्हाही काही लोक याविरोधात कोर्टात गेले होते. पण, शेवटी ग्यानचंद दुनिचंद हे देसाईगंजचे पहिले नगराध्यक्ष झाले. १९५१मध्ये देसाईगंजची लाेकसंख्या केवळ १ हजार ८०० हाेती आणि केवळ १० वर्षात १९६१ पर्यंत ११ हजार लोकवस्तीच्या शहरात नगर परिषद अस्तित्त्वात आली. गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर आरमोरी तालुक्यातील व जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद देसाईगंज येथे हाेती. त्यानंतर १९९२ला देसाईगंज तालुका घोषित झाला. देसाईगंज शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सी. सी. देसाई यांचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शहर निर्मितीच्या स्मृती विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पाेहाेचावा, यासाठी येथील अतिक्रमण हटवून सी. सी. देसाई यांच्या स्मृतिस्तंभाचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे.

बाॅक्स

काेण हाेते सी. सी. देसाई?

देसाईगंज हे नाव देणारे सी. सी. देसाई कोण हे दुर्दैवाने आज स्थानिक लोकांनासुद्धा माहीत नाही. कुणी ते मालगुजार, जुने राजकारणी नेते होते असे सांगतात. केवळ ८० ते ९० वर्षांपूर्वी नावारुपाला आलेल्या देसाईगंज शहराच्या स्थापनेचा काळ हा विस्मृतीत गेलेला आहे. १९३३ यावर्षी तत्कालीन चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सी. सी. देसाई यांची नेमणूक झाली. देसाई हे अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी होते. गुजरातच्या भद्रण या गावी २७ एप्रिल १९०० राेजी जन्मलेले देसाई १९२३मध्ये इंग्लंडमध्ये आय. सी. एस. झाले. १९३० आणि १९४०च्या दशकात मध्य प्रांतात विविध पदांवर कार्यरत देसाई पदोन्नतीने पुढे मध्य प्रांताचे मुख्य सचिव झाले. अतिशय प्रतिष्ठित अशा या प्रशासकाची पुढे १९५४ - ५७ दरम्यान भारताचे राजदूत म्हणून श्रीलंका आणि पाकिस्तान येथे रवानगी झाली.

===Photopath===

230421\23gad_6_23042021_30.jpg

===Caption===

अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले सी.सी देसाई यांचे स्मृतिस्तंभ.