शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

माहितीच्या अधिकाराचा दुरूपयोग

By admin | Updated: June 21, 2014 01:40 IST

शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ..

आरमोरी : शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी शासनाने माहितीचा अधिकार कायदा लागू केला आहे. मात्र या कायद्याचा काही नागरिकांकडून दूरूपयोग केला जात आहे. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी त्रस्त असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या महत प्रयत्नानंतर सर्वप्रथम राज्यात माहितीचा अधिकार लागू करण्यात आला. याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर केंद्र शासनानेही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ साली मंजूर केला. या कायद्यान्वये शासकीय कार्यालयातील माहिती मागण्याचा अधिकार अगदी सामान्य व्यक्तीला मिळाला आहे. नागरिकाने माहिती मागितल्यानंतर शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची झेरॉक्स काढून माहिती पुरविल्या जाते. यासाठी अत्यंत कमी शूल्क आकारल्या जाते. माहिती मागणारा बीपीएलधारक असेल तर त्याला मोफतच माहिती पुरविली जाते. यामुळे देशभरात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे भ्रष्टाचारांना या कायद्याची मोठी भीती वाटू लागली आहे. दुसरीकडे मात्र या कायद्याचा काही नागरिकांकडून दूरूपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या विषयाची माहिती मागितल्यानंतर संबंधित विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी भयभयीत होतो. आपल्यावर कारवाई होणार अशी भीती त्याच्या मनात निर्माण होते. नेमका याचा फायदा घेत या पोटभरू माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला पैशाची मागणी केली जाते. काही राजकीय पक्षांचे स्वयघोषित कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांचे हे एकमेव काम बनले आहे. कार्यालयात आपला दबदबा राहावा, यासाठीही मागणी मागितली जात आहे.ग्रामपंचायतीचे उत्पन्न अत्यंत मोजके असते. बीपीएलचा दाखला जोडून १० वर्षाची माहिती मागण्यात येते. झेरॉक्स काढण्याचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत प्रशासनाला सोसावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बरेच त्रस्त झाले आहे. अशा नागरिकांमुळे या कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. या पोटभरू कार्यकर्त्यांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून माहिती मागणाऱ्यांवरही टिका होत आहे. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी आवश्यक पावले शासनाने उचलावी. अशा पोटभरू कार्यकर्त्यांची तक्रार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)