शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

माहितीच्या अधिकाराचा दुरूपयोग

By admin | Updated: June 21, 2014 01:40 IST

शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ..

आरमोरी : शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी शासनाने माहितीचा अधिकार कायदा लागू केला आहे. मात्र या कायद्याचा काही नागरिकांकडून दूरूपयोग केला जात आहे. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी त्रस्त असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या महत प्रयत्नानंतर सर्वप्रथम राज्यात माहितीचा अधिकार लागू करण्यात आला. याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर केंद्र शासनानेही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ साली मंजूर केला. या कायद्यान्वये शासकीय कार्यालयातील माहिती मागण्याचा अधिकार अगदी सामान्य व्यक्तीला मिळाला आहे. नागरिकाने माहिती मागितल्यानंतर शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची झेरॉक्स काढून माहिती पुरविल्या जाते. यासाठी अत्यंत कमी शूल्क आकारल्या जाते. माहिती मागणारा बीपीएलधारक असेल तर त्याला मोफतच माहिती पुरविली जाते. यामुळे देशभरात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे भ्रष्टाचारांना या कायद्याची मोठी भीती वाटू लागली आहे. दुसरीकडे मात्र या कायद्याचा काही नागरिकांकडून दूरूपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या विषयाची माहिती मागितल्यानंतर संबंधित विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी भयभयीत होतो. आपल्यावर कारवाई होणार अशी भीती त्याच्या मनात निर्माण होते. नेमका याचा फायदा घेत या पोटभरू माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला पैशाची मागणी केली जाते. काही राजकीय पक्षांचे स्वयघोषित कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांचे हे एकमेव काम बनले आहे. कार्यालयात आपला दबदबा राहावा, यासाठीही मागणी मागितली जात आहे.ग्रामपंचायतीचे उत्पन्न अत्यंत मोजके असते. बीपीएलचा दाखला जोडून १० वर्षाची माहिती मागण्यात येते. झेरॉक्स काढण्याचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत प्रशासनाला सोसावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बरेच त्रस्त झाले आहे. अशा नागरिकांमुळे या कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. या पोटभरू कार्यकर्त्यांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून माहिती मागणाऱ्यांवरही टिका होत आहे. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी आवश्यक पावले शासनाने उचलावी. अशा पोटभरू कार्यकर्त्यांची तक्रार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)