शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

उद्योगक्रांतीच्या सोंगातून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:15 IST

मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्ह्यात नवीन काम दाखवा अन् बक्षीस मिळवा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही. आता उद्योग क्रांती यात्रेचे सोंग घेऊन गडचिरोलीचे आमदार नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केला. या यात्रेतून ते काय साध्य करीत आहे ते त्यांनाच माहीत, प्रत्यक्षात ही उद्योग यात्रा आहे की वसुली उद्योग यात्रा? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.सरकारने वाढवून ठेवलेली महागाई आणि निष्क्रीय कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी डॉ.उसेंडी यांनी सोमवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, स्थानिक आमदार १०० दिवसात १०० उद्योग उभारणार होते. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा किती उद्योग उभारले याचा हिशेब त्यांनी द्यावा. जिल्ह्यात या सरकारच्या काळात झालेले एकही नवीन काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आव्हानच त्यांनी राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून दिले.वास्तविक पाहता आमच्या कार्यकाळात सुरू झालेले उद्योगही टिकवणे त्यांना कठीण जात आहे. मुद्रा योजनेतून बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज दिले जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकºयांचे चुकीचे पंचनामे करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात कीडीने पिकांचे नुकसान झाले असताना पीक विमा योजनेचा लाभ दिला नाही. ही योजना शेतकºयांसाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी? असा सवाल उसेंडी यांनी केला. जनधनच्या नावावर सर्वांचे बँक खाते उघडले. पण खात्यात कमी पैसे ठेवले तर खातेधारकाला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. गोरगरीबांचे कष्टाचे पैसे कपात करून शासनाची तिजोरी भरण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. ज्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकविला नाही ते लोक आता तिरंगा यात्रा काढत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सरकार विविध क्लुप्त्या लढवत आहेत, असाही आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला. पत्रपरिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी हसनअली गिलाणी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, रजनिकांत मोटघरे, पी.टी.मसराम, शंकर सालोडकर, कुणाल पेंदोरकर व इतर उपस्थित होते.महागाईविरोधात उद्या सायकल रॅलीज्यावर पेट्रोलचे दर ठरतात त्या कच्च्या तेलाच्या किमती २०१४ च्या तुलनेत निम्म्याने कमी झाल्या आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे होण्याऐवजी पेट्रोल ६७ रुपयांवरून ८१ रुपये करण्यात आले. यामुळे इतर वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. गॅस ८१० रुपयांना घ्यावा लागत आहे. ही सामान्य नागरिकांची लूट आहे. या किमती कमी करण्यासाठी आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ३१ जानेवारीला जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर काँग्रेसकडून सायकल रॅली काढली जाणार असल्याचे डॉ.उसेंडी यांनी सांगितले.