शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उद्योगक्रांतीच्या सोंगातून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:15 IST

मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्ह्यात नवीन काम दाखवा अन् बक्षीस मिळवा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : मेक इन इंडिया असो की, मेक इन गडचिरोली गेल्या तीन वर्षात सरकार नवीन काहीही करू शकलेले नाही. आता उद्योग क्रांती यात्रेचे सोंग घेऊन गडचिरोलीचे आमदार नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केला. या यात्रेतून ते काय साध्य करीत आहे ते त्यांनाच माहीत, प्रत्यक्षात ही उद्योग यात्रा आहे की वसुली उद्योग यात्रा? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.सरकारने वाढवून ठेवलेली महागाई आणि निष्क्रीय कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी डॉ.उसेंडी यांनी सोमवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, स्थानिक आमदार १०० दिवसात १०० उद्योग उभारणार होते. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा किती उद्योग उभारले याचा हिशेब त्यांनी द्यावा. जिल्ह्यात या सरकारच्या काळात झालेले एकही नवीन काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आव्हानच त्यांनी राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून दिले.वास्तविक पाहता आमच्या कार्यकाळात सुरू झालेले उद्योगही टिकवणे त्यांना कठीण जात आहे. मुद्रा योजनेतून बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज दिले जात नाही. दुष्काळग्रस्त शेतकºयांचे चुकीचे पंचनामे करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात कीडीने पिकांचे नुकसान झाले असताना पीक विमा योजनेचा लाभ दिला नाही. ही योजना शेतकºयांसाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी? असा सवाल उसेंडी यांनी केला. जनधनच्या नावावर सर्वांचे बँक खाते उघडले. पण खात्यात कमी पैसे ठेवले तर खातेधारकाला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. गोरगरीबांचे कष्टाचे पैसे कपात करून शासनाची तिजोरी भरण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. ज्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकविला नाही ते लोक आता तिरंगा यात्रा काढत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सरकार विविध क्लुप्त्या लढवत आहेत, असाही आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला. पत्रपरिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी हसनअली गिलाणी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, रजनिकांत मोटघरे, पी.टी.मसराम, शंकर सालोडकर, कुणाल पेंदोरकर व इतर उपस्थित होते.महागाईविरोधात उद्या सायकल रॅलीज्यावर पेट्रोलचे दर ठरतात त्या कच्च्या तेलाच्या किमती २०१४ च्या तुलनेत निम्म्याने कमी झाल्या आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे होण्याऐवजी पेट्रोल ६७ रुपयांवरून ८१ रुपये करण्यात आले. यामुळे इतर वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. गॅस ८१० रुपयांना घ्यावा लागत आहे. ही सामान्य नागरिकांची लूट आहे. या किमती कमी करण्यासाठी आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ३१ जानेवारीला जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर काँग्रेसकडून सायकल रॅली काढली जाणार असल्याचे डॉ.उसेंडी यांनी सांगितले.