शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

राज्य सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST

गडचिराेली : भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार जिल्ह्याला सर्व संवर्गाचे मिळून एकूण आरक्षण ५०.५० टक्के देय आहे. यापेक्षा अधिकचे आरक्षण लागू ...

गडचिराेली : भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार जिल्ह्याला सर्व संवर्गाचे मिळून एकूण आरक्षण ५०.५० टक्के देय आहे. यापेक्षा अधिकचे आरक्षण लागू करण्यासाठी राज्यसभा व लाेकसभेत विधेयक मंजूर करून कायदा संमत करावा लागताे. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला, त्याचा लाभ फारसा होणार नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण सहा टक्क्यांवरून १७ टक्के झाल्याचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने १५ सप्टेंबर २०२१ राेजी काढला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण आरक्षणाची टक्केवारी ७६ वर पाेहाेचत आहे. सर्वाेच्च न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही, कारण या आरक्षणाला काेणताही आधार नाही. एकूणच राज्य सरकार व काँग्रेसचे नेते जिल्ह्यातील ओबीसींची दिशाभूल करीत आहेत, असा आराेप या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केला.

यावेळी आघाडीचे प्रदेश प्रतिनिधी हंसराज बडाेले, जिल्हाध्यक्ष दुर्याेधन करारे, उपाध्यक्ष राजेंद्र बांबाेळे, काेषाध्यक्ष गजानन बारसिंगे, केशव सामृतवार, आदी उपस्थित हाेते.

(बॉक्स)

निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्णय

सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला ओबीसी प्रवर्गाचा इम्पेरिकल डेटा मागविला आहे. यामध्ये ओबीसींची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती न्यायालयाला सादर करणे आवश्यक हाेते. त्यानंतर न्यायालयातर्फे आरक्षणाबाबत निर्णय व मार्गदर्शन मिळणार हाेते. मात्र, सरकारने असे काहीही न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डाेळ्यापुढे ठेवून ओबीसींचे गलेलठ्ठ मते आपल्या पदारात पाडून घेण्यासाठी आरक्षण दिल्याचा कांगावा करून ओबीसींची फसवणूक करीत आहे, असे प्रा. बडाेले यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाला राज्य घटनेच्या तरतुदीनुसार आरक्षण मिळाले पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. ओबीसींच्या वाढत्या आरक्षणाला आमचा मुळीच विराेध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.