शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

राज्य सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST

गडचिराेली : भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार जिल्ह्याला सर्व संवर्गाचे मिळून एकूण आरक्षण ५०.५० टक्के देय आहे. यापेक्षा अधिकचे आरक्षण लागू ...

गडचिराेली : भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार जिल्ह्याला सर्व संवर्गाचे मिळून एकूण आरक्षण ५०.५० टक्के देय आहे. यापेक्षा अधिकचे आरक्षण लागू करण्यासाठी राज्यसभा व लाेकसभेत विधेयक मंजूर करून कायदा संमत करावा लागताे. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला, त्याचा लाभ फारसा होणार नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण सहा टक्क्यांवरून १७ टक्के झाल्याचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने १५ सप्टेंबर २०२१ राेजी काढला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण आरक्षणाची टक्केवारी ७६ वर पाेहाेचत आहे. सर्वाेच्च न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही, कारण या आरक्षणाला काेणताही आधार नाही. एकूणच राज्य सरकार व काँग्रेसचे नेते जिल्ह्यातील ओबीसींची दिशाभूल करीत आहेत, असा आराेप या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केला.

यावेळी आघाडीचे प्रदेश प्रतिनिधी हंसराज बडाेले, जिल्हाध्यक्ष दुर्याेधन करारे, उपाध्यक्ष राजेंद्र बांबाेळे, काेषाध्यक्ष गजानन बारसिंगे, केशव सामृतवार, आदी उपस्थित हाेते.

(बॉक्स)

निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्णय

सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला ओबीसी प्रवर्गाचा इम्पेरिकल डेटा मागविला आहे. यामध्ये ओबीसींची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती न्यायालयाला सादर करणे आवश्यक हाेते. त्यानंतर न्यायालयातर्फे आरक्षणाबाबत निर्णय व मार्गदर्शन मिळणार हाेते. मात्र, सरकारने असे काहीही न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डाेळ्यापुढे ठेवून ओबीसींचे गलेलठ्ठ मते आपल्या पदारात पाडून घेण्यासाठी आरक्षण दिल्याचा कांगावा करून ओबीसींची फसवणूक करीत आहे, असे प्रा. बडाेले यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाला राज्य घटनेच्या तरतुदीनुसार आरक्षण मिळाले पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. ओबीसींच्या वाढत्या आरक्षणाला आमचा मुळीच विराेध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.