शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

अर्धवट विहीर बांधकामाने लाखो रूपये पाण्यात

By admin | Updated: May 7, 2016 00:17 IST

राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील....

एटापल्ली तालुक्यातील स्थिती : बांडे, झारेवाडा व परसलगोंदी येथील विहिरी ठरल्या आहेत बेकामीरवी रामगुंडेवार  एटापल्लीराष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र यातील अनेक विहिरींचे बांधकाम अर्धवटच राहिले आहे. तर काही विहिरी तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पध्दतीने बांधल्या आहेत. तर काही विहिरींसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. त्यामुळे या विहिरी निकामी ठरल्या असून लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.ग्रामपंचायत परसलगोंदीत समाविष्ट असलेल्या बांडेगावात तीन वर्षांपूर्वी सहा लाख रूपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीची तोंडी उंच करण्यात आली आहे. विहिरीतून पाणी काढतेवेळी सांडलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विहिरीच्या सभोवताल सिमेंटचा गोलाकार कठडा बनविणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचा कठडा बनविण्यात आला नाही. तोंडी उंच असल्यामुळे हातही पूरत नाही. विहिरीच्या सभोवताल प्लास्टरसुध्दा करण्यात आले नाही. पाणी काढता येत नसल्याने सदर विहीर बेकामी झाली आहे. कसनसूर परिसरातील जवेली खुर्द अंतर्गत पिपली बुर्गी या गावात एमआरईजीएस अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. या विहिरीचे बांधकाम सुध्दा अर्धवटच राहिले आहे. फक्त मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या विहिरीत सभोवतालचे पाणी साचत असल्याने सदर पाणी आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तोंडी बांधण्यात आली नसल्याने मुले खेळताना अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत झारेवाडा गावात निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. एक वर्षाच्या कालावधीतच चबुतरा पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या विहिरीचेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप झारेवाडा येथील नागरिकांनी केला आहे. एटापल्ली तालुक्यात बारमाही वाहणारी बांडे नदी आहे. तसेच अनेक लहान-मोठे तलाव आहेत. पाण्याची पातळी चांगली असतानाही विहिरींअभावी पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे.