शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

अर्धवट विहीर बांधकामाने लाखो रूपये पाण्यात

By admin | Updated: May 7, 2016 00:17 IST

राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील....

एटापल्ली तालुक्यातील स्थिती : बांडे, झारेवाडा व परसलगोंदी येथील विहिरी ठरल्या आहेत बेकामीरवी रामगुंडेवार  एटापल्लीराष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र यातील अनेक विहिरींचे बांधकाम अर्धवटच राहिले आहे. तर काही विहिरी तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पध्दतीने बांधल्या आहेत. तर काही विहिरींसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. त्यामुळे या विहिरी निकामी ठरल्या असून लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.ग्रामपंचायत परसलगोंदीत समाविष्ट असलेल्या बांडेगावात तीन वर्षांपूर्वी सहा लाख रूपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीची तोंडी उंच करण्यात आली आहे. विहिरीतून पाणी काढतेवेळी सांडलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विहिरीच्या सभोवताल सिमेंटचा गोलाकार कठडा बनविणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचा कठडा बनविण्यात आला नाही. तोंडी उंच असल्यामुळे हातही पूरत नाही. विहिरीच्या सभोवताल प्लास्टरसुध्दा करण्यात आले नाही. पाणी काढता येत नसल्याने सदर विहीर बेकामी झाली आहे. कसनसूर परिसरातील जवेली खुर्द अंतर्गत पिपली बुर्गी या गावात एमआरईजीएस अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. या विहिरीचे बांधकाम सुध्दा अर्धवटच राहिले आहे. फक्त मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या विहिरीत सभोवतालचे पाणी साचत असल्याने सदर पाणी आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तोंडी बांधण्यात आली नसल्याने मुले खेळताना अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत झारेवाडा गावात निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. एक वर्षाच्या कालावधीतच चबुतरा पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या विहिरीचेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप झारेवाडा येथील नागरिकांनी केला आहे. एटापल्ली तालुक्यात बारमाही वाहणारी बांडे नदी आहे. तसेच अनेक लहान-मोठे तलाव आहेत. पाण्याची पातळी चांगली असतानाही विहिरींअभावी पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे.