शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आहार पुरवठ्यात लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:45 IST

जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देजि.प.सदस्य राम मेश्राम यांचा आरोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.शालेय पोषण आहाराचा कंत्राट जानेवारी महिन्यात कन्झुमर फेडरेशन मुंबईला मिळाला, मात्र प्रत्यक्षात त्यांनी आहार पुरवठ्याची जबाबदारी दुसऱ्यांलाच दिली आहे. त्यामुळे तांदूळ पुरवठ्यात कमी वजनाच्या बॅग शाळांना पुरविल्या जात आहेत. यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर स्वत: काही शाळांना भेटी देऊन तेथील पोषण आहाराच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असताना ते निर्धारित वजनापेक्षा कमी आढळल्याचे अ‍ॅड.मेश्राम यांनी सांगितले.दि.९ फेब्रुवारीला हिरापूर येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी २ फेब्रुवारीला पोषण आहारातील तांदळाच्या कट्ट्यांचा पुरवठा झाला होता. त्यातील न वापरलेल्या तांदळाच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असता प्रत्येक कट्ट्यात दिड ते दोन किलो तांदूळ कमी आढळून आला. यावेळी हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, मुख्याध्यापक बी.एन.नवघडे व इतर लोकांसमक्ष पंचनामा केल्याचे मेश्राम यांनी सांगितले. त्याचबरोबर दि.१५ ला पोटेगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता तिथे ११ तांदळाच्या ५० किलोच्या कट्ट्यांमध्ये प्रत्येकी ५ किलो तांदूळ कमी आढळून आला. याशिवाय खाण्याचे तेल १ लिटरचे देऊन पावती मात्र १ किलोची देण्यात आली. त्यात एका पाकिटात ९० ग्रॅम तेल कमी होते. याशिवाय वटाणा, तूर दाळ यांचेही वजन कमी आढळले असून तिथेही गडचिरोली पं.स.चे उपसभापती विलास दशमुखे, मुख्याध्यापक बगमारे व इतर लोकांसमक्ष पंचनामा करण्यात आला. एफसीआयच्या पोत्यांना मध्येच छिद्र पाडून तांदूळ काढला जातो. केवळ एका तालुक्याला महिन्याला ६६ हजार किलो तांदळाचा पुरवठा होतो. त्यात ६ हजार किलो तांदूळ कमी भरल्या गेला तरी महिन्याकाठी ५० लाखांचा अपहार होत असल्याचे अ‍ॅड.मेश्राम म्हणाले.कृषी महोत्सवाला जि.प.सदस्यांचे वावडेगडचिरोलीत आयोजित कृषी व गोंडवाना महोत्सवाचे आयोजन आत्मा आणि डीआरडीएकडून केले जात आहे. मात्र जिल्हा परिषदेशी संबंधित विभाग असतानाही जि.प.उपाध्यक्ष, सभापती किंवा सदस्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले नाही. जिल्हा परिषद ही भाजपची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली का? असा सवाल करून याची चौकशी करावी अशी मागणी अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केली.