शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

आहार पुरवठ्यात लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:45 IST

जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देजि.प.सदस्य राम मेश्राम यांचा आरोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.शालेय पोषण आहाराचा कंत्राट जानेवारी महिन्यात कन्झुमर फेडरेशन मुंबईला मिळाला, मात्र प्रत्यक्षात त्यांनी आहार पुरवठ्याची जबाबदारी दुसऱ्यांलाच दिली आहे. त्यामुळे तांदूळ पुरवठ्यात कमी वजनाच्या बॅग शाळांना पुरविल्या जात आहेत. यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर स्वत: काही शाळांना भेटी देऊन तेथील पोषण आहाराच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असताना ते निर्धारित वजनापेक्षा कमी आढळल्याचे अ‍ॅड.मेश्राम यांनी सांगितले.दि.९ फेब्रुवारीला हिरापूर येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी २ फेब्रुवारीला पोषण आहारातील तांदळाच्या कट्ट्यांचा पुरवठा झाला होता. त्यातील न वापरलेल्या तांदळाच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असता प्रत्येक कट्ट्यात दिड ते दोन किलो तांदूळ कमी आढळून आला. यावेळी हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, मुख्याध्यापक बी.एन.नवघडे व इतर लोकांसमक्ष पंचनामा केल्याचे मेश्राम यांनी सांगितले. त्याचबरोबर दि.१५ ला पोटेगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता तिथे ११ तांदळाच्या ५० किलोच्या कट्ट्यांमध्ये प्रत्येकी ५ किलो तांदूळ कमी आढळून आला. याशिवाय खाण्याचे तेल १ लिटरचे देऊन पावती मात्र १ किलोची देण्यात आली. त्यात एका पाकिटात ९० ग्रॅम तेल कमी होते. याशिवाय वटाणा, तूर दाळ यांचेही वजन कमी आढळले असून तिथेही गडचिरोली पं.स.चे उपसभापती विलास दशमुखे, मुख्याध्यापक बगमारे व इतर लोकांसमक्ष पंचनामा करण्यात आला. एफसीआयच्या पोत्यांना मध्येच छिद्र पाडून तांदूळ काढला जातो. केवळ एका तालुक्याला महिन्याला ६६ हजार किलो तांदळाचा पुरवठा होतो. त्यात ६ हजार किलो तांदूळ कमी भरल्या गेला तरी महिन्याकाठी ५० लाखांचा अपहार होत असल्याचे अ‍ॅड.मेश्राम म्हणाले.कृषी महोत्सवाला जि.प.सदस्यांचे वावडेगडचिरोलीत आयोजित कृषी व गोंडवाना महोत्सवाचे आयोजन आत्मा आणि डीआरडीएकडून केले जात आहे. मात्र जिल्हा परिषदेशी संबंधित विभाग असतानाही जि.प.उपाध्यक्ष, सभापती किंवा सदस्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले नाही. जिल्हा परिषद ही भाजपची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली का? असा सवाल करून याची चौकशी करावी अशी मागणी अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केली.