शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आहार पुरवठ्यात लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:45 IST

जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देजि.प.सदस्य राम मेश्राम यांचा आरोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.शालेय पोषण आहाराचा कंत्राट जानेवारी महिन्यात कन्झुमर फेडरेशन मुंबईला मिळाला, मात्र प्रत्यक्षात त्यांनी आहार पुरवठ्याची जबाबदारी दुसऱ्यांलाच दिली आहे. त्यामुळे तांदूळ पुरवठ्यात कमी वजनाच्या बॅग शाळांना पुरविल्या जात आहेत. यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर स्वत: काही शाळांना भेटी देऊन तेथील पोषण आहाराच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असताना ते निर्धारित वजनापेक्षा कमी आढळल्याचे अ‍ॅड.मेश्राम यांनी सांगितले.दि.९ फेब्रुवारीला हिरापूर येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी २ फेब्रुवारीला पोषण आहारातील तांदळाच्या कट्ट्यांचा पुरवठा झाला होता. त्यातील न वापरलेल्या तांदळाच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असता प्रत्येक कट्ट्यात दिड ते दोन किलो तांदूळ कमी आढळून आला. यावेळी हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, मुख्याध्यापक बी.एन.नवघडे व इतर लोकांसमक्ष पंचनामा केल्याचे मेश्राम यांनी सांगितले. त्याचबरोबर दि.१५ ला पोटेगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता तिथे ११ तांदळाच्या ५० किलोच्या कट्ट्यांमध्ये प्रत्येकी ५ किलो तांदूळ कमी आढळून आला. याशिवाय खाण्याचे तेल १ लिटरचे देऊन पावती मात्र १ किलोची देण्यात आली. त्यात एका पाकिटात ९० ग्रॅम तेल कमी होते. याशिवाय वटाणा, तूर दाळ यांचेही वजन कमी आढळले असून तिथेही गडचिरोली पं.स.चे उपसभापती विलास दशमुखे, मुख्याध्यापक बगमारे व इतर लोकांसमक्ष पंचनामा करण्यात आला. एफसीआयच्या पोत्यांना मध्येच छिद्र पाडून तांदूळ काढला जातो. केवळ एका तालुक्याला महिन्याला ६६ हजार किलो तांदळाचा पुरवठा होतो. त्यात ६ हजार किलो तांदूळ कमी भरल्या गेला तरी महिन्याकाठी ५० लाखांचा अपहार होत असल्याचे अ‍ॅड.मेश्राम म्हणाले.कृषी महोत्सवाला जि.प.सदस्यांचे वावडेगडचिरोलीत आयोजित कृषी व गोंडवाना महोत्सवाचे आयोजन आत्मा आणि डीआरडीएकडून केले जात आहे. मात्र जिल्हा परिषदेशी संबंधित विभाग असतानाही जि.प.उपाध्यक्ष, सभापती किंवा सदस्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले नाही. जिल्हा परिषद ही भाजपची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली का? असा सवाल करून याची चौकशी करावी अशी मागणी अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केली.