शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

धान भरडाईच्या नियोजनासाठी मिलर्स असोसिएशनची मुंबईत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना दरवर्षी केला जातो. परंतू यावर्षी उशिराने आणि केवळ दोनच जिल्ह्यांना तांदूळ पुरवठ्याची जबाबदारी गडचिरोलीवर टाकण्यात आली. परिणामी गोदामे आणि खरेदी केंद्रांवरील धान अजूनही भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षीच्या हंगामात धान भरडाईसाठी जिल्ह्यातील ६५ राईस मिलर्सनी करारनामा केला आहे.

ठळक मुद्देअर्धेअधिक खरेदी केंद्र बंदच : तांदळाची उचल करण्यासाठी अन्य जिल्हे जोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तांदळाची उचल करण्यासाठी आतापर्यंत केवळ औरंगाबाद आणि सोलापूर या दोनच जिल्ह्यांना जोडण्यात आल्यामुळे अजूनही धान भरडाईच्या कामाला वेग आला नाही. परिणामी अर्धेअधिक धान खरेदी केंद्र बंदच आहे. यावर तोडगा काढून भरडाईसाठी योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा सीएमआर मिलर्स असोसिएशनने मुंबईत धाव घेतली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांचीही भेट घेतली. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे बळावली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना दरवर्षी केला जातो. परंतू यावर्षी उशिराने आणि केवळ दोनच जिल्ह्यांना तांदूळ पुरवठ्याची जबाबदारी गडचिरोलीवर टाकण्यात आली. परिणामी गोदामे आणि खरेदी केंद्रांवरील धान अजूनही भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षीच्या हंगामात धान भरडाईसाठी जिल्ह्यातील ६५ राईस मिलर्सनी करारनामा केला आहे. परंतू जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून पोषणयुक्त (फोर्टिफाईड) तांदूळ पुरवठा करायचा म्हणून केवळ ११ मिलर्सचे करारनामे करून नियतन देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी केलेल्या धानापैकी फक्त १४ टक्के धानाची भरडाई होऊ शकली.या सर्व अडचणींंमुळे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी रखडली आहे. ही बाब देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आकाश अग्रवाल, पुरूषोत्तम डेंगानी, अशोक चांडक आदींनी विधानसभाध्यक्ष नाना पटोले व ना.छगन यांना पटवून दिल्यानंतर त्यांनी इतर जिल्ह्यांच्या पुरवठ्याची आॅर्डर लवकरच देऊन ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.