शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

लष्करी अळ्या पान खाऊन पिकांचे नुकसान करतात. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पाण्याचा हिरवा पापुद्रा खातात. दुसºया ते तिसºया अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. या अळ्या मक्याच्या पोंग्यात राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसून येतात. सर्वसाधारण झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात.

ठळक मुद्देवाढीच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव : अहेरी, मुलचेरा, चामोर्शी तालुक्यांमध्ये हजारो हेक्टरवर पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मका पिकाची लागवड नुकतीच पार पडली आहे. मका पीक आता जवळपास फूटभर उंचीचे झाले आहे. या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आली आहे.मुलचेरा, चामोर्शी व अहेरी तालुक्यात मका पिकाची लागवड केली जाते. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील तसेच कृषी सहायक यांनी मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली चेक येथील शामलदास नगर यांच्या शेतावर १४ नोव्हेंबर रोजी भेट दिली असता, मका पिकावर ७० टक्के पेक्षा अधिक लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वाढीच्या अवस्थेत होतो. शेतकऱ्यांनी मका पिकाचे सर्वेक्षण करून पाच टक्के पेक्षा अधिक झाडे प्रादुर्भावग्रस्त आढळून आल्यास कीड नियंत्रणाचे त्वरीत करावे. या अळीची ३० दिवसात एक पिढी पूर्ण होते. हिवाळ्यात हा कालावधी दोन महिनेपर्यंत लांबू शकतो. एका वर्षात अखंड खाद्य मिळाल्यास तीन ते चार पिढ्या विविध वनस्पतींवर पूर्ण होऊ शकतात. एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पतंगांची संख्या विपुल प्रमाणात दिसून येते.लष्करी अळ्या पान खाऊन पिकांचे नुकसान करतात. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पाण्याचा हिरवा पापुद्रा खातात. दुसºया ते तिसºया अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. या अळ्या मक्याच्या पोंग्यात राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसून येतात. सर्वसाधारण झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात. मोठ्या प्रमाणात पाने खाल्याने केवळ झाडाचे मुख्य खोड किंवा पानाच्या शीरा शिल्लक राहतात. झाड फाटल्यासारखे दिसते. अशी स्थिती दिसून आल्यास वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.पिकाचे मोठे नुकसानमका पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. याच अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटते. तसेच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पीक नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करीत राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.पिकाचे मोठे नुकसानमका पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. याच अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटते. तसेच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पीक नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करीत राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.असे करा किडीचे व्यवस्थापनपतंगावर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबरच प्राधान्याने पोंगे धारण अवस्थेत लावावे. टायपोग्रामा प्रजाती, टेलेमोनस, रेमन्स या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. चार ते पाच दिवस रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. डायमेट ३० टक्के, १२.५० मिलि किंवा थायमेथोक्झाम १२.६० टक्के, लॅब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, २.५ मिलि किंवा क्लोरॅट्रॅलीनीप्रोल १८.५ टक्के, ३ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. कारबोफ्युरॉन ३ टक्के दानेदार ३३ किलो प्रती हेक्टर किंवा फोरेट १० टक्के दानेदार १० किलो प्रती हेक्टर फवारावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती