शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

लग्नपत्रिकेतून पर्यावरण संरक्षण व बेटी बचाओचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:56 IST

लग्न कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महागड्या लग्नपत्रिका छापल्या जात असल्याचे आपण बघितले आहे.

ठळक मुद्देलग्नाचा बडेजाव करण्याच्या पद्धतीला फाटा : लग्न संस्काराबरोबरच सामाजिक बांधिलकीचा परिचय

दिगांबर जवादे।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : लग्न कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महागड्या लग्नपत्रिका छापल्या जात असल्याचे आपण बघितले आहे. मात्र चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या पंकज नरूले यांनी स्वत:च्या लग्नपत्रिकेवर पर्यावरण संवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा संदेश छापला आहे. लग्न कार्याचे निमंत्रण देण्याबरोबरच सामाजिक कार्याचे आशय असलेली ही लग्नपत्रिका निमंत्रितांचे लक्ष वेधून घेत आहे.लग्न हे एक संस्कार असले तरी काळाच्या ओघात लग्नावरील खर्च वाढत चालला आहे. श्रीमंत व्यक्ती खर्च करीत असल्याने त्याचे अनुकरण करून गरीब व्यक्तीही कर्जाच्या खाईत डुबतो. त्याच्या परीने जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतो. लग्न कार्याचे निमंत्रण लग्नपत्रिकेच्या माध्यमातून दिले जाते. लग्नपत्रिका बघितल्यानंतरच आपली प्रतिष्ठा, श्रीमंती यांची जाणीव व्हावी, यासाठी लाखो रूपये शेकडा किंमत असलेल्या पत्रिका छापल्या जातात. मात्र प्रा. पंकज नरुले यांच्या लग्नाची पत्रिका अत्यंत कमी खर्चाची असली तरी सदर पत्रिका सुध्दा निमंत्रीतांचे लक्ष वेधून घेत आहे.पेशाने प्राध्यापक असले तरी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असलेल्या प्रा. पंकज नरूले यांच्या लग्नाची पत्रिका निमंत्रितांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. प्रा. पंकज नरुले यांची लग्नपत्रीका अत्यंत साधी आहे. लग्न पत्रिकेच्या कव्हरवर स्वच्छतेचा संदेश देणाºया महात्मा गांधीजींच्या चष्म्यामध्ये वर पंकज व वधू मेघा यांचे नाव लिहिण्यात आले आहे. लग्नाची तारीख, दिनांक व वेळ एका हिरव्या रंगाच्या झाडावर टाकण्यात आली आहे. या सर्व बाबी ‘वृक्षावल्ली आम्हां सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाभोवती गुंफण्यात आल्या आहेत. लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि निरोगी राहा हा संदेश देण्यात आला आहे.विवाहाचा जो संस्कार ।त्याचे महत्त्व सर्वांत थोर ।।त्या पायावरीच समाज मंदिर ।म्हणोनी सुंदर करू यासि ।।हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार लग्नपत्रिकेवर मांडण्यात आले आहेत. लग्नपत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबतचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर ‘विद्यविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार छापण्यात आले आहेत. चार पानाच्या या लग्नपत्रिकेवर केवळ आतील दोन पानावर लग्न समारंभाप्रसंगी माहिती देण्यात आली आहे. बाहेरची दोन्ही पाने व लिपाफ्यावर सामाजिक आशय छापण्यात आला आहे.सामाजिक आशय असलेली जिल्ह्यातील ही पहिलीच लग्नपत्रिका आहे. पेशाने प्राध्यापक असलेल्या पंकज नरूले हे सुध्दा लग्नपत्रिकेवर लाखो रूपये खर्च करू शकले असते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत त्यांनी सामाजिक आशय असलेली साधी पत्रिका प्रकाशित केली. एवढेच नव्हे तर लग्नकार्य त्यांनी गडचिरोलीसारख्या शहरात न ठेवता अगदी बोडधा येथील वधूच्या गावीच ठेवले आहे. यावरून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव होण्यास मदत होते. त्यांचा हे लग्न इतरांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणारे आहे.

टॅग्स :environmentवातावरण