शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

लग्नपत्रिकेतून पर्यावरण संरक्षण व बेटी बचाओचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:56 IST

लग्न कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महागड्या लग्नपत्रिका छापल्या जात असल्याचे आपण बघितले आहे.

ठळक मुद्देलग्नाचा बडेजाव करण्याच्या पद्धतीला फाटा : लग्न संस्काराबरोबरच सामाजिक बांधिलकीचा परिचय

दिगांबर जवादे।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : लग्न कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महागड्या लग्नपत्रिका छापल्या जात असल्याचे आपण बघितले आहे. मात्र चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या पंकज नरूले यांनी स्वत:च्या लग्नपत्रिकेवर पर्यावरण संवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा संदेश छापला आहे. लग्न कार्याचे निमंत्रण देण्याबरोबरच सामाजिक कार्याचे आशय असलेली ही लग्नपत्रिका निमंत्रितांचे लक्ष वेधून घेत आहे.लग्न हे एक संस्कार असले तरी काळाच्या ओघात लग्नावरील खर्च वाढत चालला आहे. श्रीमंत व्यक्ती खर्च करीत असल्याने त्याचे अनुकरण करून गरीब व्यक्तीही कर्जाच्या खाईत डुबतो. त्याच्या परीने जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतो. लग्न कार्याचे निमंत्रण लग्नपत्रिकेच्या माध्यमातून दिले जाते. लग्नपत्रिका बघितल्यानंतरच आपली प्रतिष्ठा, श्रीमंती यांची जाणीव व्हावी, यासाठी लाखो रूपये शेकडा किंमत असलेल्या पत्रिका छापल्या जातात. मात्र प्रा. पंकज नरुले यांच्या लग्नाची पत्रिका अत्यंत कमी खर्चाची असली तरी सदर पत्रिका सुध्दा निमंत्रीतांचे लक्ष वेधून घेत आहे.पेशाने प्राध्यापक असले तरी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असलेल्या प्रा. पंकज नरूले यांच्या लग्नाची पत्रिका निमंत्रितांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. प्रा. पंकज नरुले यांची लग्नपत्रीका अत्यंत साधी आहे. लग्न पत्रिकेच्या कव्हरवर स्वच्छतेचा संदेश देणाºया महात्मा गांधीजींच्या चष्म्यामध्ये वर पंकज व वधू मेघा यांचे नाव लिहिण्यात आले आहे. लग्नाची तारीख, दिनांक व वेळ एका हिरव्या रंगाच्या झाडावर टाकण्यात आली आहे. या सर्व बाबी ‘वृक्षावल्ली आम्हां सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाभोवती गुंफण्यात आल्या आहेत. लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि निरोगी राहा हा संदेश देण्यात आला आहे.विवाहाचा जो संस्कार ।त्याचे महत्त्व सर्वांत थोर ।।त्या पायावरीच समाज मंदिर ।म्हणोनी सुंदर करू यासि ।।हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार लग्नपत्रिकेवर मांडण्यात आले आहेत. लग्नपत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबतचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर ‘विद्यविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार छापण्यात आले आहेत. चार पानाच्या या लग्नपत्रिकेवर केवळ आतील दोन पानावर लग्न समारंभाप्रसंगी माहिती देण्यात आली आहे. बाहेरची दोन्ही पाने व लिपाफ्यावर सामाजिक आशय छापण्यात आला आहे.सामाजिक आशय असलेली जिल्ह्यातील ही पहिलीच लग्नपत्रिका आहे. पेशाने प्राध्यापक असलेल्या पंकज नरूले हे सुध्दा लग्नपत्रिकेवर लाखो रूपये खर्च करू शकले असते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत त्यांनी सामाजिक आशय असलेली साधी पत्रिका प्रकाशित केली. एवढेच नव्हे तर लग्नकार्य त्यांनी गडचिरोलीसारख्या शहरात न ठेवता अगदी बोडधा येथील वधूच्या गावीच ठेवले आहे. यावरून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव होण्यास मदत होते. त्यांचा हे लग्न इतरांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणारे आहे.

टॅग्स :environmentवातावरण