शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीचे मतिमंद विद्यालय हलविले आष्टीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:29 IST

प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित आलापल्ली येथील चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय हे शासनाची कोणतीही परवानगी घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशासनाला ठेवले अंधारात : शिक्षण हक्क कायद्याची संस्थेकडून पायमल्ली

आॅनलाईन लोकमतअहेरी : प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित आलापल्ली येथील चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय हे शासनाची कोणतीही परवानगी घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. शासन तसेच संबंधित विभागाकडे कुठलाही प्रस्ताव सादर न करता संबंधित संस्थेने या शाळेचे स्थानांतरण करून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सर्वांना शिक्षण मिळावे, तसेच कुणीही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये, म्हणून शासनातर्फे समावेशित शिक्षणावर कोठ्यवधी रूपयांचा निधी महाराष्टÑात खर्च केला जातो. खासगी शिक्षण संस्थांना अशा प्रकारची शाळा चालविण्यासाठी मान्यता देताना स्वतंत्र व सर्व सोयीसुविधायुक्त इमारत तसेच इतर अटी व शर्ती घातल्या जातात. मात्र याला आलापल्लीचे चाणक्य मतीमंद विद्यालय अपवाद ठरले आहे. सदर संस्थेला २००६ मध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे मतीमंद विद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. काही वर्षी ही शाळा आलापल्लीत भाड्याच्या इमारतीत सुरू होती. त्यानंतर मागील दीड वर्षापूर्वी ही शाळा लगतच्या आलापल्ली येथे नेण्यात आली. आता हेच विद्यालय मागील दोन वर्षांपूर्वी शासनाची कोणतीही परवानगी न घेता आलापल्लीपासून ४० ते ५० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आली आहे. आलापल्ली हे सर्वांसाठी मध्यर्ती ठिकाण होते. आठवड्या बाजाराला आलेले पालक आपल्या पाल्यांना भेटत होते. पण आता आष्टी येथे ही शाळा गेल्याने अहेरी उपविभागातील पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. गरीब पालकांना पदरचे पैसे खर्च करून लांब अंतरावर आष्टी येथे जायला परवडत नाही. सदर मतीमंद विद्यालयात अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी आदी पाच तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने १८ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शाळा प्रमुखाशी चर्चा केली असता, शाळा स्थानांतरित करणे हा विषय संस्थेचा आहे. आलापल्ली परिसरात योग्य इमारत उपलब्ध होत नसल्याने सदर शाळा आष्टी येथे स्थानांतरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने शाळा आलापल्ली येथे चालविण्यासाठी मान्यता दिली असताना संस्थाचालकाने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, अर्धे शैक्षणिक सत्र संपल्यावर ही शाळा लांब अंतरावर स्थानांतरित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे.१० वर्षांत स्वतंत्र इमारत नाहीवर्धा येथील शिक्षण संस्थेमार्फत आलापल्ली येथे मागील १० वर्षांपासून चाणक्य मतीमंद विद्यालय चालविले जात आहे. संबंधित संस्थेने गेल्या १० वर्षात आलापल्ली येथे विद्यालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत उभारली नाही. आता इमारत मिळत नसल्याची बाब पुढे करीत ही शाळा आपल्या मनमर्जीने आष्टी येथे स्थानांतरित केली आहे. नियमबाह्यरित्या सदर शाळा स्थानांतरित करणाºया संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गाने केली आहे. ही शाळा पूर्ववत आलापल्ली येथे आणण्यात यावी, असेही पालकांनी म्हटले आहे.शासनाची पूर्वपरवानगी असल्याशिवाय कोणतीही शाळा स्थलांतरित करता येऊ शकत नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून व याबाबतची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.- नितीन ढगे, आयुक्त समाजकल्याण पूणेशाळा स्थानांतरणाबाबत जिल्हा कार्यालयाला कोणतीही माहिती प्राप्त नाही. याबाबतचा कोणताही प्रस्ताव कार्यालयाकडे सादर केला नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही शाळा स्थलांतरित करता येत नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल.- सुरेश पेंदाम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, गडचिरोली