शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

ध्यानातून मानसिक स्वास्थ्य लाभते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:59 IST

ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे,......

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : साई मंदिरातील शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून रेडीगोडाऊन जवळील साई मंदिराच्या प्रांगणात तीन दिवशीय नि:शुल्क सहज ध्यान साधना शिबिर हार्टफुलनेस तर्फे नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. भुसारी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर आकोजवार, प्रशिक्षक प्राचार्य लता पार्लेवार, उमेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, शंकर मुस्कुटे, विनायक उईके आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. सुधीर आकोजवार म्हणाले, धकाधकीच्या जीवन पध्दतीमुळे मानवी जीवन बदलत चालले आहे. पर्यावरण व निसर्गाच्या असंतुलामुळे माणसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थावर दुष्परिणाम झाले आहे. हे दुष्परिणाम नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने नियमित ध्यान करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे शिबिर होणे गरजेचे आहे, असे सांगितले.प्राचार्य लता पार्लेवार व उमेश पटेल यांनी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रास्ताविक चंद्रशेखर भडांगे यांनी केले तर संचालन व आभार प्रकाश ताकसांडे यांनी मानले. सदर शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.