शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

संमेलन हवेच!

By admin | Updated: April 2, 2015 03:11 IST

मराठी भाषेवर ज्याचं प्रेम आहे, असा कोणी साहित्य संमेलनांना; मग ते अखिल भारतीय असो किंवा अगदी तालुका किंवा गावस्तरावरचं, विरोध करेल

प्रा. डॉ. द. ता. भोसलेमराठी भाषेवर ज्याचं प्रेम आहे, असा कोणी साहित्य संमेलनांना; मग ते अखिल भारतीय असो किंवा अगदी तालुका किंवा गावस्तरावरचं, विरोध करेल असं मला वाटत नाही. एकच भाषा बोलणारी लाखभर माणसं एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन-तीन दिवस जमतात, बोलतात, चर्चा करतात याला काहीच अर्थ नाही, असं कसं म्हणता येईल? आजच्या धकाधकीच्या काळात लेखकांना परस्परांना भेटता येतं का? या प्रश्नाचं सरळ उत्तर नाही असंच आहे. संमेलनाच्या निमित्तानं ते तसे एकत्र येतात. विचारांचं आदानप्रदान होतं, नवे विषय, नवे विचार यांची सहजपणे देवाणघेवाण होते. लेखकांनाही आपल्या वाचकांना असे समोर थेट आपल्याशी बोलताना पाहून आनंद होत असणारच की! वाचक-लेखक हा साहित्यदुवा जपायचे काम संमेलने नक्कीच करतात. या निमित्तानं नामवंत वक्त्यांची भाषणं ऐकायला मिळणं, हीही एक फायद्याचीच गोष्ट आहे. मी स्वत: तब्बल २७ पेक्षा अधिक संमेलनांना उपस्थित राहिलेला साहित्यप्रेमी आहे. अगदी अशा मोठ्या संमेलनातील नसला तरी माझा स्वत:चा विद्यार्थिदशेतील एक अनुभव सांगतो. ६० किंवा ६१ साल असेल. पुण्यातील स. प. महाविद्यालयात असंच कसलं तरी संमेलन होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर बोलणार होते. ‘पाकिस्तानचं भारतावरील आक्रमण’ असा विषय होता. मैदानात प्रचंड गर्दी होती. आम्ही बरेच विद्यार्थी वसतिगृहातून खास भाषण ऐकण्यासाठी गेलो होतो. सावरकर बोलले. फारच चांगलं भाषण झालं त्यांचं. मी आता थकलो आहे, असे ते म्हणाले व खाली बसले. त्यानंतर काय झालं समजलं नाही; पण उठून त्यांनी उत्तरार्ध सुरू केला. आजही आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. ओजस्वी वक्तृत्व म्हणजे काय याचाच तो अनुभव होता. संमेलन नसते तर तो मिळाला असता का, याचा मी आजही विचार करतो. आज कुठे आहेत असे वक्ते? असे म्हणण्यापूर्वी श्रोते असले तरच वक्ते तयार होतात हे लक्षात घ्यायला हवं. कोणत्याही गोष्टीत आर्थिक फायदा पाहायचा ही आजची रीतच आहे. तसा विचार केला तरी संमेलने फायद्याचीच आहेत. एरवीची ग्रंथविक्री व संमेलनातून होणारी २ ते ३ कोटी रुपयांची ग्रंथविक्री पाहा. त्यामुळे ग्रंथप्रसार आणि वाचनसंस्कृती रुजायला संमेलने हातभार लावतातच. अर्थात संमेलनात काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. नाट्यलेखनाची कार्यशाळा, अभिनयाची कार्यशाळा असं होऊ शकतं तर मग नवोदित लेखकांसाठी अशी कार्यशाळा का आयोजित केली जाऊ नये? गावांमध्ये अशा कार्यशाळांची नितांत गरज आहे, कथा कशी लिहावी, प्रसंग कसे फुलवावेत, वाचन कसं वाढवावं हे या कार्यशाळांमधून सांगता येईल. साहित्याची आवड आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अगदी खेड्यांमध्येही चांगली संमेलने होतात. महामंडळ त्यांना थोडीफार आर्थिक मदत करून ही अडचण दूर करू शकतं. त्यातून त्या मंडळींना उत्साह मिळेल. परप्रांतातही हवीत संमेलने. मराठी माणसे घर न सोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यानिमित्तानं एखाद्या प्रांताची ओळख होत असेल तर त्यात काही गैर नाही. नेहमीच नाही; पण अधूनमधून परप्रांतातही संमेलनं घ्यायलात हवीत, असं माझं मत आहे. एखादी सहल काढली तर मराठी माणसे आता १०-१५ हजार रुपये अगदी सहज खर्च करतात. पंजाबला जाण्यासाठी मला वाटत नाही इतका खर्च येईल. आपल्या भाषेसाठी आपण एवढंही करणार नसू तर काय बोलायचं? आणि कशाला बोलायचं?(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)