शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

मेडीगड्डाचे प्रकल्पबाधित शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:43 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणार नाही.

ठळक मुद्देपाणी मिळणार तेलंगणाला : महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणूनही लाभ नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणार नाही. प्रकल्पाचे पाणीही नाही किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून लाभही मिळणार नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.तेलंगणा राज्याला भविष्यात सुजलाम सुफलात करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेडीगड्डा प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत वाहणाऱ्या गोदावरी नदीवर मोठे धरण उभारले जात आहे.या धरणाच्या बुडीत क्षेत्रात सिरोंचा तालुक्यातील कोचमपल्ली, वडधम, आइपेटा, तुरमूलमाल, पेंटीपाका या पाच तालुक्यातील १४४.५५ हेक्टर शेतजमीन येणार आहे. या जमिनीचे गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या जिल्हास्तरिय मूल्यांकन समितीने दर निश्चित करून त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून मोबदला दिला जात आहे.पहिल्या टप्प्यात ६२ लोकांची ७.२९ हेक्टर जमीन घेण्यात आली तर दुसऱ्या टप्प्याप ५८२ लोकांची ८७.५७ हेक्टर जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर प्रकल्पात यापैकी काही शेतकऱ्यांची जमीन अंशत: तर काहींची पूर्णत: जाणार आहे. तरीही कोणत्याही शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारे लाभ दिले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांची १०० टक्के शेतजमीन जाणार असली तरी ते पूर्णत: विस्थापित होत नसल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणता येणार नाही, असे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन बुधवारी जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकर निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.विशेष म्हणजे या प्रकल्पाचे सर्व पाणी तेलंगणातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुसºया प्रकल्पांसाठी शेतकरी व इतर जमीनधारकांना चार पट जास्त मोबदला देऊन इतरही लाभ मिळत असताना या प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या आदिवासी शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारकडून पाने पुसली जात आहे. परिणामी त्यांच्यात असंतोष पसरला आहे. लोकप्रतिनिधींनीही आश्वासन पाळले नसल्याचा आरोप होत आहे.तेलंगणाच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतजमिनी देण्यास तयार झाले. त्यांना या प्रकल्पाचे पाणी नाही तर किमान प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र देऊन शासकीय लाभ देण्याची संवेदनशिलता महाराष्ट्र सरकारने दाखवावी. शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नये.- भाग्यश्री आत्राम-हलगेकर, सभापती, जि.प. गडचिरोली

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प