शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मेडीगड्डाचे प्रकल्पबाधित शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:43 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणार नाही.

ठळक मुद्देपाणी मिळणार तेलंगणाला : महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणूनही लाभ नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणार नाही. प्रकल्पाचे पाणीही नाही किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून लाभही मिळणार नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.तेलंगणा राज्याला भविष्यात सुजलाम सुफलात करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेडीगड्डा प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत वाहणाऱ्या गोदावरी नदीवर मोठे धरण उभारले जात आहे.या धरणाच्या बुडीत क्षेत्रात सिरोंचा तालुक्यातील कोचमपल्ली, वडधम, आइपेटा, तुरमूलमाल, पेंटीपाका या पाच तालुक्यातील १४४.५५ हेक्टर शेतजमीन येणार आहे. या जमिनीचे गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या जिल्हास्तरिय मूल्यांकन समितीने दर निश्चित करून त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून मोबदला दिला जात आहे.पहिल्या टप्प्यात ६२ लोकांची ७.२९ हेक्टर जमीन घेण्यात आली तर दुसऱ्या टप्प्याप ५८२ लोकांची ८७.५७ हेक्टर जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर प्रकल्पात यापैकी काही शेतकऱ्यांची जमीन अंशत: तर काहींची पूर्णत: जाणार आहे. तरीही कोणत्याही शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारे लाभ दिले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांची १०० टक्के शेतजमीन जाणार असली तरी ते पूर्णत: विस्थापित होत नसल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणता येणार नाही, असे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन बुधवारी जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकर निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.विशेष म्हणजे या प्रकल्पाचे सर्व पाणी तेलंगणातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुसºया प्रकल्पांसाठी शेतकरी व इतर जमीनधारकांना चार पट जास्त मोबदला देऊन इतरही लाभ मिळत असताना या प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या आदिवासी शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारकडून पाने पुसली जात आहे. परिणामी त्यांच्यात असंतोष पसरला आहे. लोकप्रतिनिधींनीही आश्वासन पाळले नसल्याचा आरोप होत आहे.तेलंगणाच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतजमिनी देण्यास तयार झाले. त्यांना या प्रकल्पाचे पाणी नाही तर किमान प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र देऊन शासकीय लाभ देण्याची संवेदनशिलता महाराष्ट्र सरकारने दाखवावी. शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नये.- भाग्यश्री आत्राम-हलगेकर, सभापती, जि.प. गडचिरोली

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प