शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मेडिगड्डा प्रकल्पाने शेकडो एकर शेतजमीन बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली.

ठळक मुद्देलागवडीचा खर्च पाण्यात : आरडा परिसरातील शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर मेडीगड्डा प्रकल्प साकारला. या बॅरेजमुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील आरडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेकडो एकर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली. गतीने या बॅरेजचे कामही पूर्ण करण्यात आले. या बॅरेजचा फायदा तेलंगणातील शेतकऱ्यांना झाला. मात्र हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे आता दिसून येत आहे. सद्य:स्थिती सिरोंचा तालुक्याच्या आरडा परिसरातील रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये अतोनात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची झोप पूर्णत: उडाली आहे.सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आरडा परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पदाधिकाºयांसह आरडा गावातील नागरिक रंगू किष्टय्या, येठला मल्लाना, पसूला नागेश, रंगू कमलाकर, पंतगी राजेश, ताल्लपली सदानंदम, रंगू रामप्रसाद, मारगोनी सत्यनारायण, रंगू राजू, रंगू सांभया, पसूला किष्टस्वामी, रवींद्र रंगू, येमुला राजू, नरेंद्र रंगू, मुरली रंगू, दामोदर रंगू, श्रीनिवास रंगू, रंगू मल्लया, रंगू लच्छना आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.आरडा परिसरातील शेतकºयांनी कर्ज काढून आपली शेती विकसीत केली. मात्र मेडीगड्डा प्रकल्पामुळे मिरची, कापूस तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही फटकामेडीगड्डा बॅरेजच्या अतोनात पाण्यामुळे भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही जोरदार फटका बसला आहे. आरडा गावातील शेतकरी कापूस पिकासह मिरची, कोबी व इतर प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करीत असतात. यंदाही या पिकाची लागवड झाली होती. मात्र बॅरेजच्या पाण्यामुळे फटका बसला. मत्स्यबिज वाहून गेल्याने मत्स्य व्यवसायालाही फटका बसला.जलप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीमेडीगड्डा बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्याच्या आरडा गावातील व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोलुरी, शहर अध्यक्ष विजय रंगुवार, नगर पंचायतचे स्वच्छता व आरोग्य सभापती सतिश भोगे, नगरसेवक विजय तोकला यांनी केली असून या संदर्भात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन दिले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी