शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डा प्रकल्पाने शेकडो एकर शेतजमीन बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली.

ठळक मुद्देलागवडीचा खर्च पाण्यात : आरडा परिसरातील शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर मेडीगड्डा प्रकल्प साकारला. या बॅरेजमुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील आरडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेकडो एकर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली. गतीने या बॅरेजचे कामही पूर्ण करण्यात आले. या बॅरेजचा फायदा तेलंगणातील शेतकऱ्यांना झाला. मात्र हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे आता दिसून येत आहे. सद्य:स्थिती सिरोंचा तालुक्याच्या आरडा परिसरातील रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये अतोनात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची झोप पूर्णत: उडाली आहे.सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आरडा परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पदाधिकाºयांसह आरडा गावातील नागरिक रंगू किष्टय्या, येठला मल्लाना, पसूला नागेश, रंगू कमलाकर, पंतगी राजेश, ताल्लपली सदानंदम, रंगू रामप्रसाद, मारगोनी सत्यनारायण, रंगू राजू, रंगू सांभया, पसूला किष्टस्वामी, रवींद्र रंगू, येमुला राजू, नरेंद्र रंगू, मुरली रंगू, दामोदर रंगू, श्रीनिवास रंगू, रंगू मल्लया, रंगू लच्छना आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.आरडा परिसरातील शेतकºयांनी कर्ज काढून आपली शेती विकसीत केली. मात्र मेडीगड्डा प्रकल्पामुळे मिरची, कापूस तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही फटकामेडीगड्डा बॅरेजच्या अतोनात पाण्यामुळे भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही जोरदार फटका बसला आहे. आरडा गावातील शेतकरी कापूस पिकासह मिरची, कोबी व इतर प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करीत असतात. यंदाही या पिकाची लागवड झाली होती. मात्र बॅरेजच्या पाण्यामुळे फटका बसला. मत्स्यबिज वाहून गेल्याने मत्स्य व्यवसायालाही फटका बसला.जलप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीमेडीगड्डा बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्याच्या आरडा गावातील व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोलुरी, शहर अध्यक्ष विजय रंगुवार, नगर पंचायतचे स्वच्छता व आरोग्य सभापती सतिश भोगे, नगरसेवक विजय तोकला यांनी केली असून या संदर्भात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन दिले आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी