शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

By admin | Updated: June 19, 2017 01:44 IST

मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे,

बी. एम. पाटील यांचे प्रतिपादन : अहेरीत मार्गदर्शन कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे, असे आवाहन मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी केले. अहेरी दिवाणी व फौजदारी, कनिष्ठ स्तर न्यायालयात मध्यस्थी केंद्र मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे धर्मदाय आयुक्त सातव, सरकारी अभियोक्ता अभय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. पाटील म्हणाले की, न्यायालयात विविध प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रकरणे दाखल होतात. या प्रकरणाचा निकाल लागण्यास बराच उशीर होतो. याचा फटका दोन्ही पक्षकारांना बसतो. मध्यस्ती केंद्रात प्रकरण दाखल करण्यास कोणतेच शुल्क लागत नाही. तसेच दोन्ही पक्षकारांच्यसा बाजू लक्षात घेऊन मध्यस्तीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विविध कोर्टात अपिलमध्ये नेण्यापेक्षा तडजोडीतून वाद मिटतो. दोन्ही पक्षकारांच्या पैसा व श्रमाची बचत होण्यास फार मोठी मदत होते, असे प्रतिपादन न्या. पाटील यांनी केले. न्या. जाधव यांनी मार्गदर्शन करताना मध्यस्ती केंद्र हा सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा सोपा उपाय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मध्यस्ती केंद्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. संघरत्न कुंभारे तर आभार अ‍ॅड. उदय गलबले यांनी मानले. कार्यक्रमात अ‍ॅड. सतीश जैनवार, अ‍ॅड. राजेंद्र प्रसाद, मंगनवार, अ‍ॅड. ज्योती ढोके, अ‍ॅड. ममता गलबले आदी उपस्थित होते.