शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘मावा गडचिरोली’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : सोईसुविधा निर्माण करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विचारवंतांच्या कल्पना विचार व मार्गदर्शन घेऊन जिल्ह्याचा विकास घडवून आणू असा विश्वास आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अम्ब्रीरश आत्राम यांनी व्यक्त केला.पुढे माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्य, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. २० ते २३ जून या कालावधीत योजनांचा शुभारंभ केला जाईल. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी नागेपल्ली येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा येथील सरपंच, सदस्य, अधिकारी हजर होते.विकासाच्या मुद्यांवर सूचना देणाऱ्यास पारितोषिकमावा गडचिरोली या उपक्रमाअंतर्गत ११ प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहेत. ११ प्रश्नांवर सर्वोत्कृष्ट सूचना, कल्पना व विचार सुचविणाºया व्यक्तीला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. समाजातील कुर्मा घरप्रथा बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, बाळंतपणातील सुतकप्रथा दूर करण्यासाठी उपाययोजना, अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती तसेच स्तनदा माता यांना चौरस आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहारात काही बदल करावे, असे आपणास वाटते काय? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते कोणते बदल करावेत, परसबागेत शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करायला हवे, धानाची उत्पादकता वाढविणे, साठवणूक, मूल्यवर्धन, ब्रँडींग होण्यासाठी काय अपेक्षित आहे. वनोपज संकलनातून रोजगार निर्मितीस चालना देऊन आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न व्हावयास हवे, याबाबत सूचना सूचविणाºयास पारितोषिक दिले जाणार आहे.