शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘मावा गडचिरोली’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : सोईसुविधा निर्माण करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विचारवंतांच्या कल्पना विचार व मार्गदर्शन घेऊन जिल्ह्याचा विकास घडवून आणू असा विश्वास आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अम्ब्रीरश आत्राम यांनी व्यक्त केला.पुढे माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्य, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. २० ते २३ जून या कालावधीत योजनांचा शुभारंभ केला जाईल. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी नागेपल्ली येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा येथील सरपंच, सदस्य, अधिकारी हजर होते.विकासाच्या मुद्यांवर सूचना देणाऱ्यास पारितोषिकमावा गडचिरोली या उपक्रमाअंतर्गत ११ प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहेत. ११ प्रश्नांवर सर्वोत्कृष्ट सूचना, कल्पना व विचार सुचविणाºया व्यक्तीला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. समाजातील कुर्मा घरप्रथा बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, बाळंतपणातील सुतकप्रथा दूर करण्यासाठी उपाययोजना, अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती तसेच स्तनदा माता यांना चौरस आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहारात काही बदल करावे, असे आपणास वाटते काय? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते कोणते बदल करावेत, परसबागेत शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करायला हवे, धानाची उत्पादकता वाढविणे, साठवणूक, मूल्यवर्धन, ब्रँडींग होण्यासाठी काय अपेक्षित आहे. वनोपज संकलनातून रोजगार निर्मितीस चालना देऊन आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न व्हावयास हवे, याबाबत सूचना सूचविणाºयास पारितोषिक दिले जाणार आहे.