शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

‘मावा गडचिरोली’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : सोईसुविधा निर्माण करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विचारवंतांच्या कल्पना विचार व मार्गदर्शन घेऊन जिल्ह्याचा विकास घडवून आणू असा विश्वास आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अम्ब्रीरश आत्राम यांनी व्यक्त केला.पुढे माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्य, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. २० ते २३ जून या कालावधीत योजनांचा शुभारंभ केला जाईल. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी नागेपल्ली येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा येथील सरपंच, सदस्य, अधिकारी हजर होते.विकासाच्या मुद्यांवर सूचना देणाऱ्यास पारितोषिकमावा गडचिरोली या उपक्रमाअंतर्गत ११ प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहेत. ११ प्रश्नांवर सर्वोत्कृष्ट सूचना, कल्पना व विचार सुचविणाºया व्यक्तीला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. समाजातील कुर्मा घरप्रथा बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, बाळंतपणातील सुतकप्रथा दूर करण्यासाठी उपाययोजना, अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती तसेच स्तनदा माता यांना चौरस आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहारात काही बदल करावे, असे आपणास वाटते काय? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते कोणते बदल करावेत, परसबागेत शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करायला हवे, धानाची उत्पादकता वाढविणे, साठवणूक, मूल्यवर्धन, ब्रँडींग होण्यासाठी काय अपेक्षित आहे. वनोपज संकलनातून रोजगार निर्मितीस चालना देऊन आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न व्हावयास हवे, याबाबत सूचना सूचविणाºयास पारितोषिक दिले जाणार आहे.