शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘मावा गडचिरोली’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : सोईसुविधा निर्माण करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विचारवंतांच्या कल्पना विचार व मार्गदर्शन घेऊन जिल्ह्याचा विकास घडवून आणू असा विश्वास आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अम्ब्रीरश आत्राम यांनी व्यक्त केला.पुढे माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्य, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. २० ते २३ जून या कालावधीत योजनांचा शुभारंभ केला जाईल. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी नागेपल्ली येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा येथील सरपंच, सदस्य, अधिकारी हजर होते.विकासाच्या मुद्यांवर सूचना देणाऱ्यास पारितोषिकमावा गडचिरोली या उपक्रमाअंतर्गत ११ प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहेत. ११ प्रश्नांवर सर्वोत्कृष्ट सूचना, कल्पना व विचार सुचविणाºया व्यक्तीला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. समाजातील कुर्मा घरप्रथा बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, बाळंतपणातील सुतकप्रथा दूर करण्यासाठी उपाययोजना, अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती तसेच स्तनदा माता यांना चौरस आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहारात काही बदल करावे, असे आपणास वाटते काय? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते कोणते बदल करावेत, परसबागेत शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करायला हवे, धानाची उत्पादकता वाढविणे, साठवणूक, मूल्यवर्धन, ब्रँडींग होण्यासाठी काय अपेक्षित आहे. वनोपज संकलनातून रोजगार निर्मितीस चालना देऊन आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न व्हावयास हवे, याबाबत सूचना सूचविणाºयास पारितोषिक दिले जाणार आहे.