शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

शेतकऱ्यांची पावले धानाच्या मॅट नर्सरीकडे

By admin | Updated: January 10, 2015 01:20 IST

धान शेती आता परवडणारी राहिली नाही. शेतीचा खर्चही निघणे कठिण झाले आहे, असे सांगणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात.

कोरची : धान शेती आता परवडणारी राहिली नाही. शेतीचा खर्चही निघणे कठिण झाले आहे, असे सांगणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात. मात्र अशा परिस्थितीतही शेतीतूनच नव्या समृद्धतेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाने यांत्रिकीकरणाचे वारे शेतकऱ्यांमध्ये शिरविल्यावर अनेक शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातही कृषी यांत्रिकीकरणाला सुरूवात झाली आहे.कोरची तालुक्यातील बेलगाव घाट येथील मनिराम गुरनुले व इतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. महिला शेतकरी समूह गटाच्या खरीप हंगामातील अनुभवावरून उन्हाळी भात लागवडीकरिता भाताची मॅट नर्सरी तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मॅट नर्सरीमुळे मजुरांवर होणारा अतिरिक्त खर्च, वेळेची बचत व तण नियंत्रणावर होणारा खर्च तसेच किड व रोगांपासून धानाचा बचाव व उत्पादन क्षमता वाढविणे आदी फायदे आता शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे कोरची तालुक्यातही शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळत आहेत. बेलगाव घाट येथे मनिराम गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात तालुका कृषी अधिकारी पी. के. जनबंधू, कृषी सहाय्यक बी. पी. मांदाडे, एस. एस. गावड, एस. ए. जाधव व महिला शेतकरी समूह गटाच्या अध्यक्ष रेखा कृष्णराव गावतुरे यांच्या उपस्थितीत मॅट नर्सरी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)