शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान भगवान चहांदेच्या कुटुंबाची शासनाकडून उपेक्षा

By admin | Updated: December 10, 2014 22:56 IST

नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांच्या वृध्द पित्याचा सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी गेल्या साडेपाच वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबणार कधी ?

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांच्या वृध्द पित्याचा सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी गेल्या साडेपाच वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबणार कधी ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आपला मुलगा शहीद झाला. त्याला मिळणारे लाभ कधी मिळतील हे विचारण्यासाठी चोपचे दादाजी चहांदे हे सरकारच्या गृहखात्याची विविध कार्यालये दररोज पालथी घालत आहे. परंतु अजुनही गृहविभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. एकीकडे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्यावर शासनाने कोट्यावधी रूपयाचा खर्च केला. मात्र जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आपल्या मुलाचे वेतनही अजुन शासनाने दिले नाही. सवलती लागू करण्याचा प्रश्नच गेल्या साडेपाच वर्षापासून प्रलंबित आहे. दादाजी चहांदे आपली व्यथा सांगताना म्हणाले की, मुलगा भगवान चहांदे हा गडचिरोली पोलीस दलात २००७ मध्ये दाखल झाला होता. १६ एप्रिल २००९ रोजी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पार पाडत असताना बंदूकीच्या गोळ्या लागून तो शहीद झाला. त्याच्या भरवश्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. तो पोलीस दलात आहे म्हणून एक बहिण व एका भावाला उच्च शिक्षण द्यावे, त्याचा खर्च मी उचलेन असे भगवान म्हणायचा. म्हणून दोघाही भावंडांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी नागपूरला प्रवेश दिला. परंतु २००९ मध्ये भगवान गोळी लागून शहीद झाला. राज्य सरकारच्या पोलीस विभागाने त्याला शहीदाचा दर्जा दिला. मानवंदना दिली व मला सानुग्रह मदत म्हणून २० हजार रूपये मुलाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दिले. पण पुढे मात्र काहीच मदत मिळाली नाही. २००९ पासून शहीदांना मिळणारे लाभ, नियमित पगार, विशेष वेतन आदी मिळालेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयातून १० लाखाऐवजी ५ लाखाची विमा रक्कम देण्यात आली. कमावता मुलगा गमाविल्यामुळे आता कुटुंब चालविण्यासोबतच दोन मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च करताना मला कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिचर म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या गरीब माणसाने मुलाच्या हक्काच्या लाभासाठी आणखी किती दिवस संघर्ष करायचा, असा त्यांचा सवाल आहे. परंतु लालफितशाहीत त्यांच्या मुलाच्या मोबदल्याची केस कुठे अडकली, हे सांगायलाही गृहखात्याचे अधिकारी तयार नाही. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांचीही अनेकदा भेट घेतली. परंतु ते अधिकाऱ्यांकडे बोट दाखवितात, असा अनुभव चहांदे यांना आला. दरम्यान ५ जानेवारी २०१३ रोजी गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाचे अवर सचिव यांना पत्र लिहून शहीद जवान भगवान दादाजी चहांदे यांच्या कुटुंबाला संपूर्ण आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती केली. परंतु अजुनही गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. यापूर्वी विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही या प्रकरणाबाबत पत्र दिले होते. त्या पत्राला ९ जून २०११ ला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले व सदर प्रकरण उप सचिव गृहविभाग यांच्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु अजुनपर्यंत शहीद जवान चहांदे यांच्या कुटुंबियांच्या पदरात एक कवडीही पडलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)