शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

बाजार समिती निवडणूक : गडचिरोलीत महाविकास आघाडीसमोर पहिले आव्हान 'डॅमेज कंट्रोल'चे

By संजय तिपाले | Updated: April 17, 2023 15:42 IST

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निघणार तोडगा

गडचिरोली : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधू रवींद्रबाबा आत्राम यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे,  दुसरीकडे काँग्रेसमध्ये इच्छुकांचा भरणा वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. 'डॅमेज कंट्रोल'साठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती आहे. 

 जिल्ह्यात पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गडचिरोली, चामोर्शी, अहेरी व आरमोरी बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान तर २९ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. सिरोंचा बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान हाेणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.

गतवेळी गडचिरोली बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा होता, आरमोरी, सिरोंचात भाजपच्या हाती सत्ता होती. चामोर्शीत अपक्ष अतुल गण्यारपवार यांचा  'वन मॅन' कारभार आहे. अहेरीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची हुकूमत होती. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. सहकार क्षेत्रातील 'किंगमेकर' पोरेड्डीवार घराणे गतवेळी काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपकडून आहेत.

जिल्ह्यात एक खासदार, दोन आमदार तसेच केंद्र व राज्यात सत्ता अशा जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत, यातच आमदार धर्मरावबाबा यांचे बंधू माजी जि.प.उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्रबाबा आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव ठाकरे गटाचे नेते एकत्रित येणार आहेत. ही बैठक १८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नाराजांची मनधरणी करुन महायुतीचा सामना कसा करायचा याची व्यूहरचना आखली  जाऊ शकते. 

२० एप्रिलकडे सर्वांचे लक्ष

पाच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील संचालकपदाच्या ९० पैकी गडचिरोली व सिराेंचा येथील प्रत्येकी एक अशा दोन जागा बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित ८८ जागांसाठी २८० उमेेदवार आखाड्यात आहेत.  ६ ते २० एप्रिल हा नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अवधी आहे. २० एप्रिलही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणGadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्र