शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:02 IST

पत्रकातून आगपाखड : देशभर स्मारक सभा घेण्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू (७०) हा २१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीत एकूण २७ माओवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. यानंतर माओवादी सैरभैर झाले आहेत.

माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य भूपती ऊर्फ अभय याचे २८ मे रोजी जारी झालेले पत्रक समोर आले असून, त्यात त्याने बसवा राजूच्या एन्काऊंटरबद्दल आगपाखड केली आहे. १० जून रोजी भारत बंदची हाक देत त्याने देशभर स्मारक सभादेखील आयोजित करणार असल्याचीही घोषणा केली आहे. 

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर २१ मे रोजी माओवादी व जवानांत जोरदार चकमक झाली होती. यात नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजूचा मृत्यू झाला होता. चार दशकांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा मोठा नेता मारला गेल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत २७ नक्षलवाद्यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने ५४० नक्षलवाद्यांना मारल्याचा आरोपदेखील या पत्रकात केला आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहनही नक्षलवाद्यांनी केले आहे. एवढेच प्रवक्ता अभय याने जारी केलेले हेच नाही तर ११ जून ते ३ ऑगस्टदरम्यान ते पत्रक.

बसवा राजू आणि इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीत 'स्मारक सभा' आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नक्षल चळवळीतील बसवा राजूच्या प्रवासाची इत्थंभूत माहितीही पत्रकात दिली आहे.

शोषण आहे तोपर्यंत चळवळ संपणार नाही१९७२ साली नक्षल चळवळीचा संस्थापक चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतरही असेच दावे केले जात होते. मात्र, १९७८ दरम्यान आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांत चळवळ पुन्हा उभी राहिली. १९९९ सालीदेखील केंद्र समिती सदस्य श्याम, मुरली आणि महेशला ठार करून प्रशासनाने असाच दावा केला होता. पण ही चळवळ सुरूच राहिली. चारू मुजुमदारनंतर गेल्या ५३ वर्षात अनेक मोठे नेते मारले गेले. तरीही ही चळवळ पुन्हा उभी राहिली. जोपर्यंत देशात शोषण आहे तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही, असेदेखील पत्रकात शेवटी नमूद केले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी