शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

अनेकांचे पांढरे सोने घरातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच बाजार समित्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : शेतकऱ्यांची आर्थिक अडचणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील कोटापल्ली परिसरात कापसाची लागवड केली जाते. कापूस निघण्याला सुरूवात झाली असतानाच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे कापसाची विक्री ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.कोटापल्ली परिसरातील कोटापल्ली, मोयाबीनपेठा, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मुलादिमा, दरसेवाडा, बोकाटगुड्डम, कोत्तूर, येल्ला, किरमाडा, पारसेवाडा, चिक्याला आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतात. सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड करतात. सिरोंचा येथे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत खरेदी केंद्र असले तरी तेलंगणा राज्यात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळला आहे. जानेवारी महिन्यापासून कापूस निघण्यास सुरूवात होते. एप्रिलपर्यंत जवळपास चारवेळा कापूस काढले जाते. सध्या शेवटची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला सुरूवात केली आहे. त्यामुळे पैशाची गरज आहे.सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील व्यापारी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे कापूस नेण्याची अडचण असल्याने व्यापारी कापूस खरेदी करण्यास तयार नाही. महाराष्ट्तील दुसऱ्या जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेता येत नाही. कारण जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच बाजार समित्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.ठेवण्याची अडचणकापूस हा अतिशय संवेदनशील पीक आहे. थोडीही जर आग लागली तरी संपूर्ण कापूस व घर भस्म होण्याची शक्यता राहते. पावसाने कापूस भिजल्यास तो काळा पडून खराब होण्याची भीती राहते. तसेच उन्हामुळे वजन कमी होते. त्यामुळे जास्त दिवस कापूस घरी ठेवल्यास शेतकऱ्यांचा तोटा होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन कधी उठेल, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस