शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

जंगले नष्ट झाल्याचा परिणाम, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 14:00 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. पक्ष्यांची शिकार, तलाव आणि नद्या व अतिक्रमण, जनजागृतीचा अभाव, उच्च रक्तदाब वीजवाहिन्या, शेतातील कीटकनाशकाची फवारणी यांमुळे पक्षांची संख्या झपाट्याने घटली आहे.

ठळक मुद्देहिवाळ्यात संचार करणारे पक्षी दुर्मिळवनविभागाने पुढाकार घ्यावा

प्रदीप बोडणे

गडचिरोली : कमी हाेत चालले जंगल व पक्ष्यांच्या वाढलेल्या शिकारी यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पक्ष्यांची संख्या निम्याहून कमी झाली आहे. तसेच काही प्रजाती नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहेत. वनविभागाने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या पिढ्यांना अनेक पक्षी केवळ कागदावरच बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्म दिवसापासून म्हणजेच १२ नाेव्हेंबरपासून पक्षी सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने वनविभागाने पक्षी निरीक्षणे, जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन प्रशासकीय पातळीवर पक्षी सप्ताह साजरा केला; पण पक्ष्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी वन विभागाकडून फारशा उपाययोजना होताना दिसत नाही.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील झाडीच्या जंगलात पक्षी वैभव आहे; पण हे पक्षी वैभव टिकवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. लहान खुरटी, झुडपी जंगलात आणि तलावांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात आणि विशेष म्हणजे तलावात पान वनस्पती अधिक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा संचार राहत होता. मात्र मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. पक्ष्यांची शिकार, तलाव आणि नद्या व अतिक्रमण, जनजागृतीचा अभाव, उच्च रक्तदाब वीजवाहिन्या, शेतातील कीटकनाशकाची फवारणी यांमुळे पक्षांची संख्या झपाट्याने घटली आहे.

वन विभागाने मानवीकृत रोप वनाच्या नावाखाली हजारो हेक्टर क्षेत्रावरील जंगल तोडून त्या ठिकाणी नवीन राेपे लावण्यात आली आहेत. जिल्ह्यातील उरलेसुरले जंगल वनविकास महामंडळाच्या घशात गेले. शासनाने सहकारी संस्थांना कुप देण्याच्या नावाखाली उभे जंगल नष्ट केले आहे. सरकारच्या आणि वन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पक्ष्यांचा अधिवास नाहीसा झाला.

कवडी, हरियल,पान कोंबडी, पोपट, कावळा, घार, चिमणी, कोकिळा, गिधाड, घुबड, खंड्या ,भारद्वाज या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, पण पक्ष्यांच्या निवासावर मानवी अतिक्रमण झाले. सफाई दूत म्हणून ओळखणारा गिधाड हद्दपार झाला. शिवाय कोकिळेचे मधुर स्वरही लोप पावत चालला आहेत.

थंडीची चाहूल लागली आणि शेतातील खरिपाचा हंगाम संपला आणि रब्बीचा हंगाम शेतात बहरू लागला की, पिकांना आलेला बहर टिपण्यासाठी इतर कवडी, हरियल, खंड्या, भारद्वाज, चिमणी, पोपट्या या पक्ष्यांचा संचार वाढत हाेता; पण हिवाळ्यात संचार करणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहेत. निसर्गाचा वैभव आणि मानवी मनाला आनंद देणारे पक्षांचे आवाज. त्यांच्या हालचाली मन प्रसन्न करणारे होते. पण रंगीबिरंगी गोजिरवाण्या पक्ष्यांची मानवाकडून शिकारीचे अघोरी कृत्य होत आहे. ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेऊन पक्ष्यांची संख्या वाढेल यासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे.

पक्षी संवर्धनासाठी या उपाययाेजनांची गरज

पक्ष्यांचा अधिवास कायम ठेवून त्यांच्या खाण्याची व्यवस्था हाेण्यासाठी जंगल कायम असणे आवश्यक आहे. मानवी जीवनात व पर्यावरण संवर्धनात पक्ष्यांचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे लागेल. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. शिकारीवर आळा घालावा, वनाची जैवविविधता टिकवावी, तलावांत कीटकनाशके साेडण्यावर प्रतिबंध घालावा.

टॅग्स :environmentपर्यावरणNatureनिसर्ग