शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

स्वच्छता स्पर्धेला अनेक शाळांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:55 IST

देशभरातील शाळांमध्ये स्वच्छता राखली जावी या उद्देशाने केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय स्पर्धा सुरू केली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ विद्यालय स्पर्धा : केवळ ४१ शाळांनी भरले अर्ज

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : देशभरातील शाळांमध्ये स्वच्छता राखली जावी या उद्देशाने केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय स्पर्धा सुरू केली आहे. मात्र या स्पर्धेविषयी जिल्ह्यातील शाळांचे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील जवळपास दोन हजार शाळांपैकी केवळ ४१ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली.केंद्र शासनाने २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. याच धर्तीवर देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांना ३० आॅक्टोबरपर्यंत शेवटची तारीख देण्यात आली होती. आॅनलाईन पध्दतीने मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेमध्ये स्वच्छतेबाबत असलेल्या सोयीसुविधांविषयी माहिती भरायची होती. यामध्ये प्रामुख्याने पाण्याची उपलब्धता, शौचालय व मुतारीची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तवणूक बदल व क्षमता विकास या मुख्य पाच घटकांचा समावेश आहे. या मुख्य पाच घटकांतर्गत ३९ उपघटक निश्चित करण्यात आले होते. सदर उपघटक शाळेमध्ये आहेत काय याची माहिती भरायची होती. गडचिरोली जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या मिळून जवळपास दोन हजार शाळा आहेत. मात्र यापैकी केवळ ४१ शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. उर्वरित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आॅनलाईन अर्जच भरले नाही. प्रत्येक जिल्ह्यातून कमाल ४८ शाळा राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धेसाठी पाठवायच्या होत्या. मात्र तेवढ्याही आकड्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. ज्या ४१ शाळांनी स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये २३ शाळांना केवळ तीन स्टार मिळाले आहेत. १५ शाळांना चार स्टार मिळाले आहेत. तर केवळ दोन शाळांना पाच स्टार मिळाले आहेत. पाच स्टार मिळालेल्या शाळाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतात. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या शाळांमध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शाळा व धानोरा तालुक्यातील कवडीकसा शाळेचा समावेश आहे. ही अत्यंत शोकांतिका असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या मूल्यांकनावरून धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी प्रदान करण्यात आला. या विद्यालयाचे यश जिल्ह्यातील इतर शाळांना स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रेरणायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सदर स्पर्धा ऐच्छिक असल्याने शिक्षण विभागाचे अधिकारीही महत्वपूर्ण असलेल्या या स्पर्धेला किंमत देत नाही.शाळांमध्ये सुविधा नाहीस्वच्छ विद्यालय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी केवळ पाच घटक आवश्यक आहेत. यामध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालय व मुतारीची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तवणूक बदल व क्षमता विकास या घटकांचा समावेश आहे. या मूलभूत सोयीसुविधा सुध्दा शाळांमध्ये उपलब्ध नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सुविधा नसतील तर त्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र ज्या शाळेत सुविधा आहेत, अशा शाळांना सहभाग आवश्यक करावा.