शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

१० रूपयातील भोजनाने अनेकजण होतात तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:04 IST

दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामानाने नाश्ता, जेवण आदीच्या दरातही वाढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून भुकेलेल्यांना माफक दरात अन्न देणारे विरळच. परंतु आलापल्ली येथील जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने मागील एक वर्षापासून १० रूपयांत भुकेलेल्यांना भोजनदान केले जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । आलापल्लीच्या जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेचा वर्षभरापासून सामाजिक उपक्रम

प्रशांत ठेपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामानाने नाश्ता, जेवण आदीच्या दरातही वाढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून भुकेलेल्यांना माफक दरात अन्न देणारे विरळच. परंतु आलापल्ली येथील जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने मागील एक वर्षापासून १० रूपयांत भुकेलेल्यांना भोजनदान केले जात आहे. या भोजनदानातून येथे येणारे अनेकजण तृप्त होत आहेत.आलापल्ली येथे अहेरी उपविभागातील नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. त्यादृष्टीने क्रिष्णा भुजेल यांनी एटापल्ली मार्गावरील किरायाच्या घरी मागील दोन वर्षांपासून खानावळ चालवित आहेत. यापूर्वी ते ग्राम पंचायतीच्या बाजूला बिर्याणी सेंटर दोन वर्षांपासून चालवित होते. आलापल्ली येथे येणाऱ्या लोकांचा वाढता ओढा पाहून तसेच गरजूंना अल्पदरात जेवण मिळावे, यादृष्टीने त्यांनी जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून बिर्याणी सेंटरमध्येच गरजूंना १० रूपयांत भोजन देण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे त्यांनी बिर्याणी सेंटर बंद केले. जी व्यक्ती दहा रूपयेसुद्धा देऊ शकत नाही. अशा व्यक्तींसाठी मोफत भोजन देण्याचा विढा त्यांनी उचलला. दररोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भोजनदान केले जात आहे. तसेच उरलेले अन्न सायंकाळी गरजूंना दिले जात आहे.या कामाची सुरूवात १६ मे २०१८ पासून करण्यात आली. या भोजनालयाचे उद्घाटन ग्रा. पं. तील सफाई कामगाराच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानुसार आत्तापर्यंत दररोज गरीब, गरजूंना दहा रूपयांत भोजनदान करण्याचे काम सुरू आहे. दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूंच्या दरवाढ होत असतानाच लहानापासून मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवणाच्या थाळीची किंमत वाढली आहे.१० रूपयांत काही ठिकाणी नाश्ता मिळत नाही. परंतु आलापल्ली येथे गरीब व गरजूंचे पोट भरावे म्हणून जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० रूपयांत भोजनदान केले जात आहे.३५० लोकांना भोजनदानजनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचा स्थापना दिवस १६ मे रोजी आलापल्ली येथे साजरा करण्यात आला. भोजनदानाच्या या उपक्रमाला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या दिवशी सकाळी ११ वाजतापासून ३५० च्या वर लोकांना मोफत भोजनदान करण्यात आले. आबाल वृद्ध, दिव्यांगांनी भोजनाचा आश्वाद घेतला. याप्रसंगी क्रिष्णा भुजेल, महादेव शिंगाडे, मुरली कोमले, आशिष भगत, दत्तू चिकाटे, नाना पस्पुनुरवार, अनिल चांदेकर व कळंबे उपस्थित होते.गरीब गरजूंसाठी सोईचेअहेरी उपविभागातून अनेक नागरिक आलापल्ली येथे विविध कामानिमित्त येतात. सकाळी पोहोचल्यानंतर त्यांना चाय, नाश्ता करावा लागतो. यात बराचसा पैसा खर्च होतो. परंतु जनकल्याण बहुउद्देशीय विकास संस्थेद्वारे १० रूपयांत भोजनदान केले जात असल्याने बाहेरगावाहून आलेल्या गरीब, गरजूंना सोयीचे झाले आहे. भीक मागून जीवन जगणारे अनेक व्यक्ती येथे भोजन करून आपल्या पोटाची भूक मिटवितात. या सर्वांसाठी हे भोजनालय सोयीचे झाले आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवक