शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपूर येथील विधानभवन सभागृहात घेतला जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य सचिव डी. के. जैन, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १० जुलै अखेर ३ हजार ६६५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तीन वर्षात १० हजार ८१७ कामे पूर्ण झाली. १८१ मालगुजारी तलाव दुरूस्त झाले. ३ हजार १३८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्यासाठी २९ अभियंते नियुक्त केले आहेत. गडचिरोली रेल्वे मार्गासाठी खासगी जमीन संपादीत करण्याचे काम वन विभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबविण्याच्या सूचना रेल्वेतर्फे दिल्या होत्या. वन विभागाची परवानगी येत्या आठ दिवसात मिळाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरूवात होईल, अशी माहिती वने व पालकसचिव विकास खारगे यांनी दिली.सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाच्या वाहतुकीचे काम स्थानिकांना मिळेल, यादृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी बैठकीदरम्यान सादर केले.१६ गावे सौरऊर्जेने प्रकाशलीसौरऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दुर्गम भागातील ४९ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी १६ गावे सौरऊर्जेने प्रकाशली आहेत. चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाचे नुकसान टाळण्यासाठी २२ गोदामे बांधली जाणार आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीministerमंत्री