शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपूर येथील विधानभवन सभागृहात घेतला जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य सचिव डी. के. जैन, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १० जुलै अखेर ३ हजार ६६५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तीन वर्षात १० हजार ८१७ कामे पूर्ण झाली. १८१ मालगुजारी तलाव दुरूस्त झाले. ३ हजार १३८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्यासाठी २९ अभियंते नियुक्त केले आहेत. गडचिरोली रेल्वे मार्गासाठी खासगी जमीन संपादीत करण्याचे काम वन विभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबविण्याच्या सूचना रेल्वेतर्फे दिल्या होत्या. वन विभागाची परवानगी येत्या आठ दिवसात मिळाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरूवात होईल, अशी माहिती वने व पालकसचिव विकास खारगे यांनी दिली.सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाच्या वाहतुकीचे काम स्थानिकांना मिळेल, यादृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी बैठकीदरम्यान सादर केले.१६ गावे सौरऊर्जेने प्रकाशलीसौरऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दुर्गम भागातील ४९ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी १६ गावे सौरऊर्जेने प्रकाशली आहेत. चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाचे नुकसान टाळण्यासाठी २२ गोदामे बांधली जाणार आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीministerमंत्री