शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपूर येथील विधानभवन सभागृहात घेतला जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य सचिव डी. के. जैन, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १० जुलै अखेर ३ हजार ६६५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तीन वर्षात १० हजार ८१७ कामे पूर्ण झाली. १८१ मालगुजारी तलाव दुरूस्त झाले. ३ हजार १३८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्यासाठी २९ अभियंते नियुक्त केले आहेत. गडचिरोली रेल्वे मार्गासाठी खासगी जमीन संपादीत करण्याचे काम वन विभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबविण्याच्या सूचना रेल्वेतर्फे दिल्या होत्या. वन विभागाची परवानगी येत्या आठ दिवसात मिळाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरूवात होईल, अशी माहिती वने व पालकसचिव विकास खारगे यांनी दिली.सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाच्या वाहतुकीचे काम स्थानिकांना मिळेल, यादृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी बैठकीदरम्यान सादर केले.१६ गावे सौरऊर्जेने प्रकाशलीसौरऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दुर्गम भागातील ४९ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी १६ गावे सौरऊर्जेने प्रकाशली आहेत. चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाचे नुकसान टाळण्यासाठी २२ गोदामे बांधली जाणार आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीministerमंत्री