शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

गडचिरोलीसाठी जलयुक्तचा तीन वर्षांचा विशेष आराखडा बनवा

By admin | Updated: December 19, 2015 01:23 IST

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्र असल्याने सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत...

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : खास बाब अंतर्गत ५० हजार सिंचन विहिरी उभारागडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्र असल्याने सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तीन वर्षांचा विशेष कृती आराखडा बनवून जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी तसेच या काळात गडचिरोली जिल्ह्यात ५० हजार विहिरींची कामे खास बाब म्हणून घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले.नागपूरच्या विधानभवनात गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे तसेच राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदींची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यात भूजल पातळी खूप उत्तम आहे. ती अधिक वाढवून भूस्तरापर्यंत जलस्तर उंचावणे शक्य आहे. याचा अभ्यास करुन माथा ते पायथा पद्धतीने पाणलोट विकास करण्याचे नियोजन जलयुक्त शिवार कार्यक्रमात करा व याचा तीन वर्षांचा विशेष आराखडा सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे निश्चित करताना लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्याच्या दृष्टीकोणातून या नियोजनासाठी मतदारसंघानिहाय बैठका घ्याव्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सिंचन क्षमता वाढीसाठी जिल्ह्यात ५० हजार विहिरींची क्षमता मान्य करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यासाठी प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.जिल्ह्यामध्ये ७ लक्ष २५ हजार मेट्रीक टन धान खरेदी दरवर्षी होते. मात्र साठवण क्षमता याच्या निम्मी आहे. त्यामुळे ८९ गोदामांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे. १० कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधीही वितरित झालेला आहे यातून क्षमता वाढणार आहे. सोबतच धान वाहतुकीचे दर लवकर अंतिम करुन येईल तसे धान खरेदी करण्याची पद्धत पुन्हा सुरु करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी केली. या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)