लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना तेलंगणा राज्यातील वरंगल, करीमनगर व हैदराबाद येथील रूग्णालयांमध्ये उपचार घेणे सोयीचे होते. त्यामुळे राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत या शहरांमधील काही दवाखाण्यांसोबत करार करून मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वित्तमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा हे शहर महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. सिरोंचापासून चंद्रपूर २२०, गडचिरोली २१०, नागपूर ३०५ किमी अंतर आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणे कठीण होते. दुर्गम भागातील नागरिकांना तेलगूशिवाय इतर भाषा बोलता येत नाही व समजत सुध्दा नाही. त्यामुळे उपचार घेताना अडचण निर्माण होते. तेलंगणा राज्यातील हैदराबाद हे शहर सिरोंचा पासून २६५ किमी, वरंगल १४० किमी व करीमनगर १६० किमी अंतर आहे. या शहरांमधील काही खासगी रूग्णालयांसोबत करार करून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. प्राणहिता, गोदावरी नद्यांवर आता पूल झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटली आहे. त्यामुळे रहदारी वाढली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ब्रह्मानंद कोलागटू, राजू पेदापल्ली, सुरेश पद्मगिरवार, संदीप राचर्लावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तेलंगणातील रूग्णालयांसोबत जीवनदायीचा करार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा हे शहर महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. सिरोंचापासून चंद्रपूर २२०, गडचिरोली २१०, नागपूर ३०५ किमी अंतर आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणे कठीण होते. दुर्गम भागातील नागरिकांना तेलगूशिवाय इतर भाषा बोलता येत नाही व समजत सुध्दा नाही.
तेलंगणातील रूग्णालयांसोबत जीवनदायीचा करार करा
ठळक मुद्देसिरोंचातील नागरिकांची मागणी । गडचिरोली, नागपुरात जाणे होते कठीण