शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

रोजगार निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील

By admin | Updated: February 15, 2016 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मात्र दळणवळणाच्या सोयीअभावी उद्योग सुरू होऊ शकले नाही.

चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मात्र दळणवळणाच्या सोयीअभावी उद्योग सुरू होऊ शकले नाही. यापूर्वीच्या शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुटला. मात्र सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार जास्तीतजास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. तालुक्यातील राजगोपालपूर येथे आदिवासी संमेलन व शेतकरी, शेतमजूर, महिला बेरोजगारांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, सरपंच गोहणे, शिक्षीका सुरजागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे. धानाबरोबरच कापूस, मका, सूर्यफूल, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्या यासाठी शासनस्तरावरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर पाणी उपशाची साधणेही वितरित केली जात आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडून जाणून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)