शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

विशेष योजनांचा निधी उपलब्ध करून द्या

By admin | Updated: November 25, 2014 22:56 IST

गडचिरोली जिल्ह्यात विशेष योजनांवर निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम

मुख्यमंत्र्यांना निवेदन : जि.प. पदाधिकारी भेटलेगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विशेष योजनांवर निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गडचिरोली जिल्हा रस्ते, कृषी, सिंचन या क्षेत्रात मागे राहिला आहे. वनकायदा तसेच विविध योजनांवर मिळणारा अपुरा निधी, कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदे यामुळे विकासावर मोठा परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहे. तसेच सिंचन प्रकल्पही मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याला निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील पर्यटनस्थळाचा शेगावच्या आनंदसागर प्रकल्पाच्या धर्तीवर विकास करण्यात यावा, राज्यपालांची ९ जून २०१४ ची पेसा अधिसूचना रद्द करण्यात यावी, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जाती यांचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, जिल्ह्यातील १६४५ मामा तलाव दुरूस्ती व बारमाही पाणीसाठा उपलब्ध राहण्यासाठी याला फिशटँकचे स्वरूप देण्याकरीता तीन वर्षात ५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास प्रत्येक तलावात २० लाखापर्यंत मत्स्य व्यवसाय होऊन यातून जिल्हा परिषद, ग्रामपंचायती व गावांचाही विकास निधीच्या माध्यमातून होऊ शकतो. या कामासाठी राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही जि.प. पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वैनगंगा नदीवर गणपूर, आष्टी येथे बॅरेजेस बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच चिचडोह, भेंडाळा, नेताजीनगर, आष्टी, वाकडी, शांतीग्राम, टिकेपल्ली, मुलचेरा, रेगुंठा, भामरागड या उपसा सिंचन योजनांकरीता निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आहे.