शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मानवी अस्तित्वाकरिता संसाधने टिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:34 IST

भारतीय संविधानाने नागरिकांना जल, जंगल व जमिनीवर मालकी हक्क प्रदान केले आहे. पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाकरिता संसाधनांचे रक्षण होणे फार गरजेचे आहे. यासाठी तरूणांनी पुढे यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय राईट लाईव्हलीहुड पुरस्कार प्राप्त ओडिशा येथील निमगिरी आंदोलनाचे प्रनेते प्रफुल्ल सामंतारा यांनी केले.

ठळक मुद्देकुरखेडात ‘सुसंवाद तरूणाईशी’ : प्रफुल्ल सामंतारा यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : भारतीय संविधानाने नागरिकांना जल, जंगल व जमिनीवर मालकी हक्क प्रदान केले आहे. पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाकरिता संसाधनांचे रक्षण होणे फार गरजेचे आहे. यासाठी तरूणांनी पुढे यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय राईट लाईव्हलीहुड पुरस्कार प्राप्त ओडिशा येथील निमगिरी आंदोलनाचे प्रनेते प्रफुल्ल सामंतारा यांनी केले.गुजरात राज्यातील दांडी येथून १ आॅक्टोबरपासून संविधान सन्मान यात्रा काढली आहे. ही यात्रा शनिवारी कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात पोहोचली. यावेळी महाविद्यालयात ‘सुसंवाद तरूणाईशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश गोगुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, समाजसेविका शुभदा देशमुख आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यात्रेसोबत आलेले गुजरात येथील पर्यावरण सुरक्षा समितीचे कार्यकर्ते तथा राष्ट्रीय जनआंदोलनाचे समन्वयक कृष्णकांत यांनी सांगितले की, लोकशाही मजबूत होण्याकरिता संविधानाचे रक्षण होणे फार महत्त्वाचे आहे. गरीब श्रीमंत, शहरी, ग्रामीण असा कोणताही भेदभाव न करता, सर्वांना समान संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पुणे येथील सुनिता सु. र. यांनी सांगितले की, लोकशाहीतही चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवाज बुलंद करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाचे रक्षण व सन्मान याबाबत शपथ देण्यात आली. संचालन व आभार महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.