शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

शहरातून जाणारे मुख्य मार्ग बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले.

ठळक मुद्देराष्टÑीय महामार्ग प्राधिकरण सुस्त : चामोर्शी, आरमोरी मार्गावरील डांबरीकरण जागोजागी उखडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी-गडचिरोली, गडचिरोली-आरमोरी या मुख्य डांबरी मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात या मार्गावर खड्डे निर्माण झाले. त्यानंतर सदर मार्गाची प्राधिकरणाकडून थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली. पुन्हा जोरदार झालेल्या पावसाने हे मुख्य राष्टÑीय महामार्ग जैसे थे झाले. त्यानंतर स्थानिक नगर पालिका प्रशासनाने मुरूम व विटाची माती टाकून चामोर्शी मार्गावरील खड्डे बुजविले. आता खड्ड्यांचा आकार २ फूट खोल व ३ फूट रूंद असा झाला आहे. मोठ्या स्वरूपाचे खड्डे निर्माण झाल्याने बसमधील तसेच इतर खासगी वाहनातील प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.गडचिरोली शहरात बायपास मार्ग विकसित करण्यात आले नाही. त्यामुळे अहेरी, सिरोंचा, भामरागडकडे जाणारे ओव्हरलोड ट्रक चामोर्शी मार्गे आवागमन करतात. त्यामुळे मुख्य मार्गाची अशी दुरवस्था झाली आहे. आरमोरी व धानोरा मार्गाचीही अवस्था याहीपेक्षा दयनिय आहे.पोटेगाव बायपास मार्गावर जीवघेणे खड्डेस्थानिक इंदिरा गांधी चौकातून चामोर्शीमार्गे रेड्डी गोडाऊन परिसरातून पोटेगाव मार्गाला जोडणाºया रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या मार्गावरील मुलींच्या वसतिगृहासमोर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. सदर खड्डे सुरुवातीला मुरूम टाकून बुजविण्यात आले. त्यानंतर येथे डांबराची छुर्री टाकून सपाटीकरण करण्यात आले. मात्र जोरदार बरसलेल्या पावसाने मुरूम व छुर्री गायब केली. आता सदर खड्ड्यांचा आकार प्रचंड वाढला आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गावरील पथदिवे बंद झाल्यास वाहनधारकाचा अपघात या ठिकाणी निश्चित आहे. त्यामुळे या मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.