शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... नाहीतर फुलांच्या ‘माेहा’त हिंस्त्र घेतील जीव!

By गेापाल लाजुरकर | Updated: March 23, 2023 16:11 IST

वाघ-बिबट्यांसह अस्वलांची दहशत : दाेन वनविभागांत सर्वाधिक धाेका

गडचिरोली : हिरव्यागर्द वनराईत बिनधास्तपणे व्यक्ती फिरू शकेल, अशी स्थिती गत पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात हाेती. मात्र, चार वर्षांपूर्वीपासून ती बदलली. आता ती स्थिती राहिली नाही. चार वर्षांपासून जिल्ह्यात वाघांसह बिबट व अस्वलांचा वावर वाढल्याने जंगलातच नव्हे, तर शेतशिवारांतही जाणे धाेकादायक ठरत आहे. नुकतीच माेहफूल संकलनाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच माेहफूल संकलनाचे काम केले जात असल्याने सर्वाधिक गडचिराेली, वडसा वनविभागांत, तर काही प्रमाणात अन्य वनविभागांत माेहफूल वेचणाऱ्या लाेकांवर वाघ, बिबट व अस्वलांच्या हल्ल्याचा धाेका आहे.

गडचिराेली जिल्ह्यात जंगलासह शेतीच्या बांधावर व रस्त्यालगत माेठ्या प्रमाणावर माेहाची झाडे आहेत. शेतकऱ्यांसह शेतमजूर जंगलातील व शेतीच्या बांधावरील माेहफूल वेचणीसाठी जातात. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच माेहफूल संकलनाला सुरुवात हाेते. हा हंगाम जवळपास एक महिना चालताे. म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत माेहफूल वेचणी सुरू असते. पाच वर्षांपूर्वी कुठेही, काेणत्याही ठिकाणी माेहफूल वेचणीसाठी नागरिक जात असत; परंतु गत चार वर्षांपासून जिल्ह्यात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्याची विदारक स्थिती निर्माण झाल्याने काेणतेही नागरिक सध्यातरी रात्रीच्या सुमारास किंवा पहाटे माेहफूल वेचण्यासाठी शेतशिवारातसुद्धा जाण्यास धजावत नाही. विशेष म्हणजे, वनविभागाकडून नागरिकांमध्ये रात्रीच्या सुमारास जंगलात न जाण्याबाबत व माेहफूल संकलन सतर्कतेबाबत जागृती केली जात आहे.

माेहफूल वेचताना काय दक्षता घ्यावी?

माेहफूल वेचण्यासाठी मध्यरात्री, तसेच पहाटे नागरिक शेतात अथवा जंगल परिसरात जातात. अशावेळी हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ला हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. एकट्याने जंगलात जाऊ नये. तीन, चारच्या गटाने आवाज करीत जावे. वाघ, बिबट दिसल्यास जाेरजाेराने आवाज करावा. पाणवठ्याजवळ जाताना सावधगिरी बाळगावी. विशेषत: सकाळी ८ ते ९ वाजता माेहफूल संकलनासाठी जावे. तसेच दुपारी ३ वाजेच्या आत परत यावे, असे आवाहन वन्यजीवप्रेमी तथा पीपल फाॅर एन्व्हायर्नमेंट अँड ॲनिमल वेलफेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांनी केले.

गडचिराेली वनविभागात ६, तर वडसात २१ वाघांचा वावर

गडचिराेली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, अमिर्झा, राजगाटा, चुरचुरा, महादवाडी, नवरगाव, आंबेटाेला परिसरात एकूण सहा वाघांचा सध्या वावर आहे. वाघांमध्ये जी-१, जी-१०, एसएएम-८२, जी-१६ आदी नर वाघांचा, तर जी-२ व जी-५ (टी-६) आदी मादी वाघांचा समावेश आहे. जी-२ वाघिणीला दाेन बछडे असून, ते तिच्यासाेबत वावरताना दिसतात. ही बाब ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट हाेते. वडसा वनविभागात एकूण २१ वाघांचा वावर आहे. हे वाघ गडचिराेली तालुक्यासह कुरखेडा तालुक्यातील जंगलातसुद्धा ये-जा करीत असतात.

‘ते’ दाेन बछडे कुठे झाले गायब?

टी-६ वाघिणीच्या चार बछड्यांपैकी दाेन बछड्यांचा मृत्यू दाेन महिन्यांपूर्वी झाला हाेता. त्यानंतर दाेन बछडे जिवंत हाेते; परंतु ते बछडे आता वनविभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये येत नाहीत. अन्य हिंस्त्र प्राण्यांकडून त्या बछड्यांची शिकार तर झाली नसावी ना, असा प्रश्न पडताे.

गणेशपूर व जेप्रातील महिलेने गमावला जीव

गडचिराेली तालुक्यातील जेप्रा येथील महिलेला मागील वर्षी २०२२ मध्ये माेहफूल संकलन करताना वाघाने ठार केले हाेते. तर अशीच एक घटना आरमाेरी तालुक्याच्या गणेशपूर येथे २०२१ मध्ये घडली. माेहफूल संकलन करणाऱ्या महिलेला गणेशपूरच्या जंगलात वाघाने ठार केले हाेते.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली