शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सावधान... नाहीतर फुलांच्या ‘माेहा’त हिंस्त्र घेतील जीव!

By गेापाल लाजुरकर | Updated: March 23, 2023 16:11 IST

वाघ-बिबट्यांसह अस्वलांची दहशत : दाेन वनविभागांत सर्वाधिक धाेका

गडचिरोली : हिरव्यागर्द वनराईत बिनधास्तपणे व्यक्ती फिरू शकेल, अशी स्थिती गत पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात हाेती. मात्र, चार वर्षांपूर्वीपासून ती बदलली. आता ती स्थिती राहिली नाही. चार वर्षांपासून जिल्ह्यात वाघांसह बिबट व अस्वलांचा वावर वाढल्याने जंगलातच नव्हे, तर शेतशिवारांतही जाणे धाेकादायक ठरत आहे. नुकतीच माेहफूल संकलनाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच माेहफूल संकलनाचे काम केले जात असल्याने सर्वाधिक गडचिराेली, वडसा वनविभागांत, तर काही प्रमाणात अन्य वनविभागांत माेहफूल वेचणाऱ्या लाेकांवर वाघ, बिबट व अस्वलांच्या हल्ल्याचा धाेका आहे.

गडचिराेली जिल्ह्यात जंगलासह शेतीच्या बांधावर व रस्त्यालगत माेठ्या प्रमाणावर माेहाची झाडे आहेत. शेतकऱ्यांसह शेतमजूर जंगलातील व शेतीच्या बांधावरील माेहफूल वेचणीसाठी जातात. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच माेहफूल संकलनाला सुरुवात हाेते. हा हंगाम जवळपास एक महिना चालताे. म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत माेहफूल वेचणी सुरू असते. पाच वर्षांपूर्वी कुठेही, काेणत्याही ठिकाणी माेहफूल वेचणीसाठी नागरिक जात असत; परंतु गत चार वर्षांपासून जिल्ह्यात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्याची विदारक स्थिती निर्माण झाल्याने काेणतेही नागरिक सध्यातरी रात्रीच्या सुमारास किंवा पहाटे माेहफूल वेचण्यासाठी शेतशिवारातसुद्धा जाण्यास धजावत नाही. विशेष म्हणजे, वनविभागाकडून नागरिकांमध्ये रात्रीच्या सुमारास जंगलात न जाण्याबाबत व माेहफूल संकलन सतर्कतेबाबत जागृती केली जात आहे.

माेहफूल वेचताना काय दक्षता घ्यावी?

माेहफूल वेचण्यासाठी मध्यरात्री, तसेच पहाटे नागरिक शेतात अथवा जंगल परिसरात जातात. अशावेळी हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ला हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. एकट्याने जंगलात जाऊ नये. तीन, चारच्या गटाने आवाज करीत जावे. वाघ, बिबट दिसल्यास जाेरजाेराने आवाज करावा. पाणवठ्याजवळ जाताना सावधगिरी बाळगावी. विशेषत: सकाळी ८ ते ९ वाजता माेहफूल संकलनासाठी जावे. तसेच दुपारी ३ वाजेच्या आत परत यावे, असे आवाहन वन्यजीवप्रेमी तथा पीपल फाॅर एन्व्हायर्नमेंट अँड ॲनिमल वेलफेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांनी केले.

गडचिराेली वनविभागात ६, तर वडसात २१ वाघांचा वावर

गडचिराेली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, अमिर्झा, राजगाटा, चुरचुरा, महादवाडी, नवरगाव, आंबेटाेला परिसरात एकूण सहा वाघांचा सध्या वावर आहे. वाघांमध्ये जी-१, जी-१०, एसएएम-८२, जी-१६ आदी नर वाघांचा, तर जी-२ व जी-५ (टी-६) आदी मादी वाघांचा समावेश आहे. जी-२ वाघिणीला दाेन बछडे असून, ते तिच्यासाेबत वावरताना दिसतात. ही बाब ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट हाेते. वडसा वनविभागात एकूण २१ वाघांचा वावर आहे. हे वाघ गडचिराेली तालुक्यासह कुरखेडा तालुक्यातील जंगलातसुद्धा ये-जा करीत असतात.

‘ते’ दाेन बछडे कुठे झाले गायब?

टी-६ वाघिणीच्या चार बछड्यांपैकी दाेन बछड्यांचा मृत्यू दाेन महिन्यांपूर्वी झाला हाेता. त्यानंतर दाेन बछडे जिवंत हाेते; परंतु ते बछडे आता वनविभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये येत नाहीत. अन्य हिंस्त्र प्राण्यांकडून त्या बछड्यांची शिकार तर झाली नसावी ना, असा प्रश्न पडताे.

गणेशपूर व जेप्रातील महिलेने गमावला जीव

गडचिराेली तालुक्यातील जेप्रा येथील महिलेला मागील वर्षी २०२२ मध्ये माेहफूल संकलन करताना वाघाने ठार केले हाेते. तर अशीच एक घटना आरमाेरी तालुक्याच्या गणेशपूर येथे २०२१ मध्ये घडली. माेहफूल संकलन करणाऱ्या महिलेला गणेशपूरच्या जंगलात वाघाने ठार केले हाेते.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली