शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:33 IST

पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.

ठळक मुद्देधोका टाळण्याचा प्रयत्न : विद्युत उपकरणांची दुरूस्ती

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.पावसाळ्यात वादळ व जोराच्या पावसामुळे वीज तारा तुटणे, जम्पर, इन्सुलेटर तुटणे, वीज खांब कोसळणे यासारख्या घटना घडतात. यामुळे जीवित व वित्तहानी होते. वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण सुध्दा वाढते. हे टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत.गडचिरोली सर्कलअंतर्गत ब्रह्मपुरी, गडचिरोली व आलापल्ली हे तीन विभाग येतात. या तिन्ही विभागात देखभाल व दुरूस्तीची कामे मागील एक महिन्यापासून सुरू झाली आहेत. वीज तारांजवळ आलेल्या ३ हजार ९८६ स्पॅनमधील झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. ५४९ पिन इन्सुलेटर, ७५ डिस्क इन्सुलेटर बदलविण्यात आले आहेत. २५ वीज खांबांना नवीन अर्थींग देण्यात आले आहे. ५७ ट्रान्सफार्मरमध्ये योग्य पातळीपर्यंत आॅईल टाकण्यात आले आहे. डीटीसी केबल सुध्दा बदलविण्यात आले आहे. ८२ एलटी डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलविण्यात आले आहेत. ३५० नवीन जम्पर लावले आहेत. अर्धा किमी एचटी लाईन, एलटी लाईनला गार्डींग बसविण्यात आले आहे. रोड क्रॉस होत असलेल्या जवळपास ३०० मीटरवर गार्डींग बसविण्यात आली आहे. ३५ किमीवर नवीन सर्विस वायर टाकले आहे. ३५ डिस्ट्रीब्युशन बॉक्स, ४५ डीटीसी गॅसकेट व ३०० मीटरवरील जळालेले केबल बदलविण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीमुळे वीज खंडीत होण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.१२० नवीन खांब लागलेविजेची संपूर्ण सुरक्षितता वीज खांबावर अवलंबून आहे. त्यामुळे वीज खांब मजबूत असणे अत्यंत आवश्यक असल्याने वीज विभाग खांबाबाबत अतिशय संवेदनशील राहते. काही दिवसानंतर लोखंडी खांब गंजतात किंवा वादळामुळे वाकतात. सदर खांब पावसळ्यात कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता अधिक राहते. परिणामी गंजलेले किंवा वाकलेले खांब बदलविण्यावर महावितरण विशेष भर देते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी ११२ खांब बदलविण्यात आले आहेत. यामध्ये ब्रह्मपुरी विभागातील ५२, गडचिरोली विभागातील ५५ व आलापल्ली विभागातील पाच खांबांचा समावेश आहे. 

टॅग्स :electricityवीज