शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:33 IST

पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.

ठळक मुद्देधोका टाळण्याचा प्रयत्न : विद्युत उपकरणांची दुरूस्ती

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.पावसाळ्यात वादळ व जोराच्या पावसामुळे वीज तारा तुटणे, जम्पर, इन्सुलेटर तुटणे, वीज खांब कोसळणे यासारख्या घटना घडतात. यामुळे जीवित व वित्तहानी होते. वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण सुध्दा वाढते. हे टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत.गडचिरोली सर्कलअंतर्गत ब्रह्मपुरी, गडचिरोली व आलापल्ली हे तीन विभाग येतात. या तिन्ही विभागात देखभाल व दुरूस्तीची कामे मागील एक महिन्यापासून सुरू झाली आहेत. वीज तारांजवळ आलेल्या ३ हजार ९८६ स्पॅनमधील झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. ५४९ पिन इन्सुलेटर, ७५ डिस्क इन्सुलेटर बदलविण्यात आले आहेत. २५ वीज खांबांना नवीन अर्थींग देण्यात आले आहे. ५७ ट्रान्सफार्मरमध्ये योग्य पातळीपर्यंत आॅईल टाकण्यात आले आहे. डीटीसी केबल सुध्दा बदलविण्यात आले आहे. ८२ एलटी डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलविण्यात आले आहेत. ३५० नवीन जम्पर लावले आहेत. अर्धा किमी एचटी लाईन, एलटी लाईनला गार्डींग बसविण्यात आले आहे. रोड क्रॉस होत असलेल्या जवळपास ३०० मीटरवर गार्डींग बसविण्यात आली आहे. ३५ किमीवर नवीन सर्विस वायर टाकले आहे. ३५ डिस्ट्रीब्युशन बॉक्स, ४५ डीटीसी गॅसकेट व ३०० मीटरवरील जळालेले केबल बदलविण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीमुळे वीज खंडीत होण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.१२० नवीन खांब लागलेविजेची संपूर्ण सुरक्षितता वीज खांबावर अवलंबून आहे. त्यामुळे वीज खांब मजबूत असणे अत्यंत आवश्यक असल्याने वीज विभाग खांबाबाबत अतिशय संवेदनशील राहते. काही दिवसानंतर लोखंडी खांब गंजतात किंवा वादळामुळे वाकतात. सदर खांब पावसळ्यात कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता अधिक राहते. परिणामी गंजलेले किंवा वाकलेले खांब बदलविण्यावर महावितरण विशेष भर देते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी ११२ खांब बदलविण्यात आले आहेत. यामध्ये ब्रह्मपुरी विभागातील ५२, गडचिरोली विभागातील ५५ व आलापल्ली विभागातील पाच खांबांचा समावेश आहे. 

टॅग्स :electricityवीज