शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:33 IST

पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.

ठळक मुद्देधोका टाळण्याचा प्रयत्न : विद्युत उपकरणांची दुरूस्ती

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.पावसाळ्यात वादळ व जोराच्या पावसामुळे वीज तारा तुटणे, जम्पर, इन्सुलेटर तुटणे, वीज खांब कोसळणे यासारख्या घटना घडतात. यामुळे जीवित व वित्तहानी होते. वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण सुध्दा वाढते. हे टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत.गडचिरोली सर्कलअंतर्गत ब्रह्मपुरी, गडचिरोली व आलापल्ली हे तीन विभाग येतात. या तिन्ही विभागात देखभाल व दुरूस्तीची कामे मागील एक महिन्यापासून सुरू झाली आहेत. वीज तारांजवळ आलेल्या ३ हजार ९८६ स्पॅनमधील झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. ५४९ पिन इन्सुलेटर, ७५ डिस्क इन्सुलेटर बदलविण्यात आले आहेत. २५ वीज खांबांना नवीन अर्थींग देण्यात आले आहे. ५७ ट्रान्सफार्मरमध्ये योग्य पातळीपर्यंत आॅईल टाकण्यात आले आहे. डीटीसी केबल सुध्दा बदलविण्यात आले आहे. ८२ एलटी डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलविण्यात आले आहेत. ३५० नवीन जम्पर लावले आहेत. अर्धा किमी एचटी लाईन, एलटी लाईनला गार्डींग बसविण्यात आले आहे. रोड क्रॉस होत असलेल्या जवळपास ३०० मीटरवर गार्डींग बसविण्यात आली आहे. ३५ किमीवर नवीन सर्विस वायर टाकले आहे. ३५ डिस्ट्रीब्युशन बॉक्स, ४५ डीटीसी गॅसकेट व ३०० मीटरवरील जळालेले केबल बदलविण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीमुळे वीज खंडीत होण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.१२० नवीन खांब लागलेविजेची संपूर्ण सुरक्षितता वीज खांबावर अवलंबून आहे. त्यामुळे वीज खांब मजबूत असणे अत्यंत आवश्यक असल्याने वीज विभाग खांबाबाबत अतिशय संवेदनशील राहते. काही दिवसानंतर लोखंडी खांब गंजतात किंवा वादळामुळे वाकतात. सदर खांब पावसळ्यात कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता अधिक राहते. परिणामी गंजलेले किंवा वाकलेले खांब बदलविण्यावर महावितरण विशेष भर देते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी ११२ खांब बदलविण्यात आले आहेत. यामध्ये ब्रह्मपुरी विभागातील ५२, गडचिरोली विभागातील ५५ व आलापल्ली विभागातील पाच खांबांचा समावेश आहे. 

टॅग्स :electricityवीज