शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेवून असतात. त्यामुळे त्या पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणणे सुकर होण्यासाठी अनेक जण पक्षीय पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ज्या गावात ज्याचा दबदबा आहे अशा नागरिकांना हेरून त्यांनाच आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवण्यासाठी काही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देमोर्चेबांधणी सुरू : इच्छुक उमेदवारांचे फिल्डींग लावणे सुरू

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि १७ जानेवारी अशा दोन टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे लढण्याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी या आघाडीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेवून असतात. त्यामुळे त्या पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणणे सुकर होण्यासाठी अनेक जण पक्षीय पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ज्या गावात ज्याचा दबदबा आहे अशा नागरिकांना हेरून त्यांनाच आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवण्यासाठी काही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे वरच्या स्तरावर प्रयत्न आहेत. त्याची नगर पंचायत निवडणुकीत अंमलबजावणीही होण्याची शक्यता आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूर जुळणे कठीणच असल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येते. अशा स्थितीत ही निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत होण्याची शक्यता जास्त आहे. 

- तर इच्छुकांची गोची होणारनिवडणुकीसाठी शिल्लक असलेला कालावधी पाहता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून ३६२ ग्रामपंचायतीमधील उमेदवार निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे लढायचे असा निर्णय झाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होणार आहे. 

स्थानिक संस्थांमध्ये भाजपचा दबदबाजिल्ह्याची एकूण स्थिती पाहता गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा बऱ्यापैकी दबदबा आहे तर दक्षिण भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक ठिकाणी वर्चस्व आहे. त्यामुळे वरकरणी भाजपशी जवळीकता ठेवणाऱ्यांसाठी ही निवडणूक अधिक सोपी राहील, असे मानले जाते.

विधान परिषदेतून झाली रंगीत तालीमनुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या वि.प.निवडणुकीत भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात त्या पराभवात गडचिरोली जिल्ह्याचा वाटा कमी असला तरी मतदारांचा कल कुणीकडे झुकत आहे याचा अंदाज या निवडणुकीतून आला. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वाला धक्का तर लागणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेत वर्चस्वाची लढाईजिल्ह्यात सध्या शिवसेनेत कोणाचा पायपोस कोणात नाही. पदाधिकाऱ्यांनी वर्चस्वावरून एकमेकांविरूद्ध उघड बंड पुकारले आहे. कोण खरा आणि कोण खोटा, या संभ्रमात सामान्य शिवसैनिक पिचून गेला आहे. नेतृत्वावरून सुरू झालेल्या या गटबाजीचा सेनेला ग्रा.पं. निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक