शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या गडावर आता महाविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपचे प्राबल्य असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवून धमाल उडवून दिली. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाममात्र अस्तित्व असणाऱ्या सेनेने मारलेली ही मुसंडी पक्षाला बळकटी देणारी ठरणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींवर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतील पक्षांनी आणि विशेषत: काँग्रेस आणि शिवसेनेने आपला झेंडा फडकविला, ते पाहून जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलत असल्याची जाणीव सध्या होत आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व आहे; पण नगरपंचायतींच्या निकालांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला आहे. काँग्रेसचे नेते तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन, नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिलेले बळ यामुळेच या दोन्ही पक्षांनी सत्तेच्या दिशेने झेप घेतली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सतत पुढे जात असलेला भाजपचा विजयरथ  नगरपंचायतच्या निकालाने रोखला आहे. सात वर्षांत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबत नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतही बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण करण्यात भाजपला यश मिळाले आहे; पण राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेसोबत काँग्रेसनेही संघटनात्मक फेरबदल केले. विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपचे प्राबल्य असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवून धमाल उडवून दिली. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाममात्र अस्तित्व असणाऱ्या सेनेने मारलेली ही मुसंडी पक्षाला बळकटी देणारी ठरणार आहे.दक्षिण गडचिरोलीत उदयास आलेल्या आदिवासी विद्यार्थी संघालाही या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. माजी आमदार दीपक आत्राम हे संस्थापक असले तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या खेळीमुळे मोठ्या पक्षांना मागे टाकत ‘आविसं’ने दोन ठिकाणचे नगराध्यक्षपद आणि तीन ठिकाणी उपाध्यक्षपद पदरी पाडून घेतले आहे.

काँग्रेसला नवसंजीवनीजिल्ह्यात कमजोर होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला मंत्री विजय वडेट्टीवारांमुळे पुन्हा उभारी मिळत आहे. युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही नव्या दमाची फळी तयार करून काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असली तरी त्याला आता फारसे महत्त्व न देता जुने- नवे पदाधिकारी सोबत काम करताना दिसत आहेत.

भाजप कुठे कमी पडली?

राज्यात सत्तेवरून दूर झाल्यानंतर भाजपला आपले प्रभावक्षेत्र टिकवून ठेवणे कठीण झाले. त्यात विरोधक जास्त सक्रिय झाल्यामुळे भाजपला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे खासदार, दोन आमदार असतानाही भाजपला अपयशाचा सामना करावा लागला आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक