शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 ; आतापर्यंत फक्त दोनच महिलांनी लढविला निवडणुकीचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.

ठळक मुद्देआरमोरी विधानसभा मतदारसंघ : एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ जण रिंगणात

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : आरमोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंत राज्य विधानसभेसाठी १२ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यातून निवडून आलेले सर्व १२ ही आमदार हे पुरुषच होते. सन १९६२ पासूनच्या निवडणुकांचा आढावा घेतला असता ५८ वर्षांच्या काळात फक्त दोन महिलांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवल्याचे दिसून येते.आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्यावहिल्या सन १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते सन १९९५ पर्यंतच्या तब्बल ३४ वर्षांच्या कालावधीत झालेल्या एकूण आठ निवडणुकींमध्ये प्रथमच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एका महिला उमेदवाराने आरमोरी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. ती महिला उमेदवार होती रजनी बळीराम वरठे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे) या पक्षाकडून वरठे यांनी निवडणूक लढली. त्यावेळच्या निवडणुकीत १९ उमेदवारांमध्ये त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. पण त्यांना अवघी १०९४ मते मिळाली. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामकृष्ण हरी मडावी यांनी बाजी मारली. मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांचा १३ हजार ४४८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत महिला उमेदवार रजनी वरठे पराभूत झाल्या असल्या तरी आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला म्हणून लढण्याचा मान त्यांना प्राप्त झाला.त्यानंतरच्या सन १९९९, सन २००४ आणि सन २००९ मध्ये झालेल्या तीनही निवडणुकीत एकही महिला उमेदवार निवडणूक लढली नाही. सन १९९५ पासून पुन्हा १९ वर्षानंतर, म्हणजे २०१४ ला दुसऱ्यांदा एका महिलेने निवडणूक लढली. त्या महिला उमेदवार होत्या कोमल रवी बारसागडे (ताडाम). बहुजन समाज पार्टीने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १५ हजार ६९७ एवढी मते मिळाली होती. पण त्यांना विजयश्री गाठता आली नाही. त्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून लढलेले कृष्णा गजबे यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा १२ हजार ७३३ मतांनी पराभव केला.या मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंतच्या ५८ वर्षांत झालेल्या एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ उमेदवारांनी निवडणूक लढली. त्यात तब्बल ८९ उमेदवार पुरुष तर फक्त दोन उमेदवार महिला होत्या.

टॅग्स :armori-acअरमोरी