शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Maharashtra Election 2019 ; आतापर्यंत फक्त दोनच महिलांनी लढविला निवडणुकीचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.

ठळक मुद्देआरमोरी विधानसभा मतदारसंघ : एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ जण रिंगणात

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : आरमोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंत राज्य विधानसभेसाठी १२ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यातून निवडून आलेले सर्व १२ ही आमदार हे पुरुषच होते. सन १९६२ पासूनच्या निवडणुकांचा आढावा घेतला असता ५८ वर्षांच्या काळात फक्त दोन महिलांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवल्याचे दिसून येते.आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्यावहिल्या सन १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते सन १९९५ पर्यंतच्या तब्बल ३४ वर्षांच्या कालावधीत झालेल्या एकूण आठ निवडणुकींमध्ये प्रथमच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एका महिला उमेदवाराने आरमोरी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. ती महिला उमेदवार होती रजनी बळीराम वरठे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे) या पक्षाकडून वरठे यांनी निवडणूक लढली. त्यावेळच्या निवडणुकीत १९ उमेदवारांमध्ये त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. पण त्यांना अवघी १०९४ मते मिळाली. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामकृष्ण हरी मडावी यांनी बाजी मारली. मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांचा १३ हजार ४४८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत महिला उमेदवार रजनी वरठे पराभूत झाल्या असल्या तरी आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला म्हणून लढण्याचा मान त्यांना प्राप्त झाला.त्यानंतरच्या सन १९९९, सन २००४ आणि सन २००९ मध्ये झालेल्या तीनही निवडणुकीत एकही महिला उमेदवार निवडणूक लढली नाही. सन १९९५ पासून पुन्हा १९ वर्षानंतर, म्हणजे २०१४ ला दुसऱ्यांदा एका महिलेने निवडणूक लढली. त्या महिला उमेदवार होत्या कोमल रवी बारसागडे (ताडाम). बहुजन समाज पार्टीने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १५ हजार ६९७ एवढी मते मिळाली होती. पण त्यांना विजयश्री गाठता आली नाही. त्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून लढलेले कृष्णा गजबे यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा १२ हजार ७३३ मतांनी पराभव केला.या मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंतच्या ५८ वर्षांत झालेल्या एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ उमेदवारांनी निवडणूक लढली. त्यात तब्बल ८९ उमेदवार पुरुष तर फक्त दोन उमेदवार महिला होत्या.

टॅग्स :armori-acअरमोरी