शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

कमी उंचीच्या पुलाची समस्या कायम

By admin | Updated: November 4, 2014 22:41 IST

आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील

वैरागड : आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील गावांच्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वैलोचना नदीच्या पुलावरून मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, मांगदा, अंगारा, मालेवाडा, डोंगरतमाशी, वडेगाव, पिसेवडधा व २५ गावातील वाहतूक सुरू असते. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात थोडाजरी पाऊस आला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी सदर मार्ग पूर्णत: ठप्प होतो. याशिवाय पुलापलिकडील गावांचा आरमोरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. अनेकदा पावसाळ्यात या पुलावरून ८ ते १० फूट पाणी वाहते. वैरागड येथील शेतकऱ्यांच्या पुलांच्या पलिकडे शेतजमिनी आहेत. मात्र पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नदीपलिकडील शेतकऱ्यांना शेतावर पोहोचता येत नाही. वैलोचना नदीवरील या पुलाची अनेकदा तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन शासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही. पुलाचे खांब उभारण्यासाठी उन्हाळ्यात महिनाभर सर्व्हेक्षण देखील करण्यात आले मात्र १५ वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाही. (वार्ताहर)