शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कमी उंचीच्या पुलाची समस्या कायम

By admin | Updated: November 4, 2014 22:41 IST

आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील

वैरागड : आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील गावांच्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वैलोचना नदीच्या पुलावरून मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, मांगदा, अंगारा, मालेवाडा, डोंगरतमाशी, वडेगाव, पिसेवडधा व २५ गावातील वाहतूक सुरू असते. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात थोडाजरी पाऊस आला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी सदर मार्ग पूर्णत: ठप्प होतो. याशिवाय पुलापलिकडील गावांचा आरमोरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. अनेकदा पावसाळ्यात या पुलावरून ८ ते १० फूट पाणी वाहते. वैरागड येथील शेतकऱ्यांच्या पुलांच्या पलिकडे शेतजमिनी आहेत. मात्र पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नदीपलिकडील शेतकऱ्यांना शेतावर पोहोचता येत नाही. वैलोचना नदीवरील या पुलाची अनेकदा तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन शासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही. पुलाचे खांब उभारण्यासाठी उन्हाळ्यात महिनाभर सर्व्हेक्षण देखील करण्यात आले मात्र १५ वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाही. (वार्ताहर)