शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

कमी उंचीच्या पुलाची समस्या कायम

By admin | Updated: November 4, 2014 22:41 IST

आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील

वैरागड : आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील गावांच्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वैलोचना नदीच्या पुलावरून मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, मांगदा, अंगारा, मालेवाडा, डोंगरतमाशी, वडेगाव, पिसेवडधा व २५ गावातील वाहतूक सुरू असते. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात थोडाजरी पाऊस आला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी सदर मार्ग पूर्णत: ठप्प होतो. याशिवाय पुलापलिकडील गावांचा आरमोरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. अनेकदा पावसाळ्यात या पुलावरून ८ ते १० फूट पाणी वाहते. वैरागड येथील शेतकऱ्यांच्या पुलांच्या पलिकडे शेतजमिनी आहेत. मात्र पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नदीपलिकडील शेतकऱ्यांना शेतावर पोहोचता येत नाही. वैलोचना नदीवरील या पुलाची अनेकदा तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन शासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही. पुलाचे खांब उभारण्यासाठी उन्हाळ्यात महिनाभर सर्व्हेक्षण देखील करण्यात आले मात्र १५ वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाही. (वार्ताहर)