शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कमी भारमानाच्या एसटी बसफेऱ्या होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:44 IST

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे.

गडचिरोली : एसटी महामंडळाचा वाढणारा तोटा कमी करण्यासाठी आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ज्या मार्गावरील बसफेरीचे भारमान (प्रवाशी संख्या) ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशा मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने आगारांना दिले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद होऊन खासगी वाहनधारकांची मनमानी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे. एसटीचा एकूण तोटा सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. काही विभागीय कार्यालयांकडे बसमध्ये डिझेल भरण्यासाठीसुध्दा पैसे शिल्लक राहात नाही, अशी बिकट स्थितती निर्माण झाली आहे. तोटा वाढत गेल्यास एसटी महामंडळ चालविणे कठीण होणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चालविल्या जातात. मात्र या बसला अत्यंत कमी प्रवाशी मिळत असल्याने बसफेरीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे ज्या बसफेरीचे भारमान ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशी बसफेरी तत्काळ बंद करून त्याऐवजी ज्या मार्गावर अधिक प्रवाशी मिळू शकतात, अशा मार्गावर बसफेरी सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यभरातील सर्व आगारांना दिले आहेत. ३० टक्केपेक्षा कमी भारमान असलेल्या किती बसफेऱ्या आहेत याची माहितीसुध्दा मागितली आहे. लवकरच या बसफेऱ्या बंद होणार आहेत.

छोट्या गाड्या बंद केल्याने तोट्यात भर

एसटीची खरी गरज ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. परंतू महामंडळाच्या मोठ्या आकाराच्या बसेससाठी पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ज्या मार्गावर प्रवाशी कमी असतात, अशा मार्गावर मध्यम आकाराच्या चालक-वाहक एकच असलेल्या बसफेऱ्या सुरू केल्यास ते एसटी महामंडळासाठी फायद्याचे ठरू शकते. १० वर्षापूर्वी ‘यशवंती’नावाने छोट्या गाड्या महामंडळाने सुरू केल्या होत्या. पण आज त्यापैकी एकही बस महामंडळात नाही. त्या छोट्या बसेस का गायब करण्यात आल्या याचे कारण गुलदस्त्यात आहे.

‘गाव तिथे एसटी’या ब्रिदाला तडा

एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रिदवाक्य घेऊन व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून बसगाड्यांची सोय करत गावोगावी बसफेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नवीन निर्णयामुळे अनेक फेऱ्या बंद होऊन महामंडळाच्या ब्रिदवाक्यालाच तडा जाणार आहे. यामुळे ग्रामीण नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागात एसटी बस नाही त्या मार्गावर खासगी वाहने भरभरून जातात. असे असताना महामंडळाकडून छोट्या गाड्यांचा वापर करणे सोडून बसफेरीच बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या संतापाला उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र