शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कमी भारमानाच्या एसटी बसफेऱ्या होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:44 IST

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे.

गडचिरोली : एसटी महामंडळाचा वाढणारा तोटा कमी करण्यासाठी आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ज्या मार्गावरील बसफेरीचे भारमान (प्रवाशी संख्या) ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशा मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने आगारांना दिले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद होऊन खासगी वाहनधारकांची मनमानी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे. एसटीचा एकूण तोटा सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. काही विभागीय कार्यालयांकडे बसमध्ये डिझेल भरण्यासाठीसुध्दा पैसे शिल्लक राहात नाही, अशी बिकट स्थितती निर्माण झाली आहे. तोटा वाढत गेल्यास एसटी महामंडळ चालविणे कठीण होणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चालविल्या जातात. मात्र या बसला अत्यंत कमी प्रवाशी मिळत असल्याने बसफेरीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे ज्या बसफेरीचे भारमान ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशी बसफेरी तत्काळ बंद करून त्याऐवजी ज्या मार्गावर अधिक प्रवाशी मिळू शकतात, अशा मार्गावर बसफेरी सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यभरातील सर्व आगारांना दिले आहेत. ३० टक्केपेक्षा कमी भारमान असलेल्या किती बसफेऱ्या आहेत याची माहितीसुध्दा मागितली आहे. लवकरच या बसफेऱ्या बंद होणार आहेत.

छोट्या गाड्या बंद केल्याने तोट्यात भर

एसटीची खरी गरज ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. परंतू महामंडळाच्या मोठ्या आकाराच्या बसेससाठी पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ज्या मार्गावर प्रवाशी कमी असतात, अशा मार्गावर मध्यम आकाराच्या चालक-वाहक एकच असलेल्या बसफेऱ्या सुरू केल्यास ते एसटी महामंडळासाठी फायद्याचे ठरू शकते. १० वर्षापूर्वी ‘यशवंती’नावाने छोट्या गाड्या महामंडळाने सुरू केल्या होत्या. पण आज त्यापैकी एकही बस महामंडळात नाही. त्या छोट्या बसेस का गायब करण्यात आल्या याचे कारण गुलदस्त्यात आहे.

‘गाव तिथे एसटी’या ब्रिदाला तडा

एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रिदवाक्य घेऊन व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून बसगाड्यांची सोय करत गावोगावी बसफेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नवीन निर्णयामुळे अनेक फेऱ्या बंद होऊन महामंडळाच्या ब्रिदवाक्यालाच तडा जाणार आहे. यामुळे ग्रामीण नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागात एसटी बस नाही त्या मार्गावर खासगी वाहने भरभरून जातात. असे असताना महामंडळाकडून छोट्या गाड्यांचा वापर करणे सोडून बसफेरीच बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या संतापाला उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र