शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कमी भारमानाच्या एसटी बसफेऱ्या होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:44 IST

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे.

गडचिरोली : एसटी महामंडळाचा वाढणारा तोटा कमी करण्यासाठी आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ज्या मार्गावरील बसफेरीचे भारमान (प्रवाशी संख्या) ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशा मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने आगारांना दिले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद होऊन खासगी वाहनधारकांची मनमानी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे. एसटीचा एकूण तोटा सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. काही विभागीय कार्यालयांकडे बसमध्ये डिझेल भरण्यासाठीसुध्दा पैसे शिल्लक राहात नाही, अशी बिकट स्थितती निर्माण झाली आहे. तोटा वाढत गेल्यास एसटी महामंडळ चालविणे कठीण होणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चालविल्या जातात. मात्र या बसला अत्यंत कमी प्रवाशी मिळत असल्याने बसफेरीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे ज्या बसफेरीचे भारमान ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशी बसफेरी तत्काळ बंद करून त्याऐवजी ज्या मार्गावर अधिक प्रवाशी मिळू शकतात, अशा मार्गावर बसफेरी सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यभरातील सर्व आगारांना दिले आहेत. ३० टक्केपेक्षा कमी भारमान असलेल्या किती बसफेऱ्या आहेत याची माहितीसुध्दा मागितली आहे. लवकरच या बसफेऱ्या बंद होणार आहेत.

छोट्या गाड्या बंद केल्याने तोट्यात भर

एसटीची खरी गरज ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. परंतू महामंडळाच्या मोठ्या आकाराच्या बसेससाठी पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ज्या मार्गावर प्रवाशी कमी असतात, अशा मार्गावर मध्यम आकाराच्या चालक-वाहक एकच असलेल्या बसफेऱ्या सुरू केल्यास ते एसटी महामंडळासाठी फायद्याचे ठरू शकते. १० वर्षापूर्वी ‘यशवंती’नावाने छोट्या गाड्या महामंडळाने सुरू केल्या होत्या. पण आज त्यापैकी एकही बस महामंडळात नाही. त्या छोट्या बसेस का गायब करण्यात आल्या याचे कारण गुलदस्त्यात आहे.

‘गाव तिथे एसटी’या ब्रिदाला तडा

एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रिदवाक्य घेऊन व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून बसगाड्यांची सोय करत गावोगावी बसफेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नवीन निर्णयामुळे अनेक फेऱ्या बंद होऊन महामंडळाच्या ब्रिदवाक्यालाच तडा जाणार आहे. यामुळे ग्रामीण नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागात एसटी बस नाही त्या मार्गावर खासगी वाहने भरभरून जातात. असे असताना महामंडळाकडून छोट्या गाड्यांचा वापर करणे सोडून बसफेरीच बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या संतापाला उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र