शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कमी भारमानाच्या एसटी बसफेऱ्या होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:44 IST

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे.

गडचिरोली : एसटी महामंडळाचा वाढणारा तोटा कमी करण्यासाठी आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ज्या मार्गावरील बसफेरीचे भारमान (प्रवाशी संख्या) ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशा मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने आगारांना दिले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद होऊन खासगी वाहनधारकांची मनमानी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे. एसटीचा एकूण तोटा सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. काही विभागीय कार्यालयांकडे बसमध्ये डिझेल भरण्यासाठीसुध्दा पैसे शिल्लक राहात नाही, अशी बिकट स्थितती निर्माण झाली आहे. तोटा वाढत गेल्यास एसटी महामंडळ चालविणे कठीण होणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चालविल्या जातात. मात्र या बसला अत्यंत कमी प्रवाशी मिळत असल्याने बसफेरीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे ज्या बसफेरीचे भारमान ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशी बसफेरी तत्काळ बंद करून त्याऐवजी ज्या मार्गावर अधिक प्रवाशी मिळू शकतात, अशा मार्गावर बसफेरी सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यभरातील सर्व आगारांना दिले आहेत. ३० टक्केपेक्षा कमी भारमान असलेल्या किती बसफेऱ्या आहेत याची माहितीसुध्दा मागितली आहे. लवकरच या बसफेऱ्या बंद होणार आहेत.

छोट्या गाड्या बंद केल्याने तोट्यात भर

एसटीची खरी गरज ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. परंतू महामंडळाच्या मोठ्या आकाराच्या बसेससाठी पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ज्या मार्गावर प्रवाशी कमी असतात, अशा मार्गावर मध्यम आकाराच्या चालक-वाहक एकच असलेल्या बसफेऱ्या सुरू केल्यास ते एसटी महामंडळासाठी फायद्याचे ठरू शकते. १० वर्षापूर्वी ‘यशवंती’नावाने छोट्या गाड्या महामंडळाने सुरू केल्या होत्या. पण आज त्यापैकी एकही बस महामंडळात नाही. त्या छोट्या बसेस का गायब करण्यात आल्या याचे कारण गुलदस्त्यात आहे.

‘गाव तिथे एसटी’या ब्रिदाला तडा

एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रिदवाक्य घेऊन व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून बसगाड्यांची सोय करत गावोगावी बसफेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नवीन निर्णयामुळे अनेक फेऱ्या बंद होऊन महामंडळाच्या ब्रिदवाक्यालाच तडा जाणार आहे. यामुळे ग्रामीण नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागात एसटी बस नाही त्या मार्गावर खासगी वाहने भरभरून जातात. असे असताना महामंडळाकडून छोट्या गाड्यांचा वापर करणे सोडून बसफेरीच बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या संतापाला उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र