शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दम्याच्या औषधीसाठी कोकडीत लोटला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:01 IST

देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत ही रांग कायम होती. वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मार्गदर्शनात औषधी देण्यात आली.प्रल्हाद कावळे यांचा सेवाभावी उपक्रम मागील ३८ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मृगनक्षत्राच्या पर्वावर शुक्रवारी १२.३० वाजेपासून मासोळीतून दमा रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यास सुरुवात झाली. यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडत हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. संपूर्ण कोकडी गाव नागरिक व वाहनांच्या गर्दीने फुलून गेला होता. देसाईगंजपासून कोकडीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आ.कृष्णा गजबे यांनी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. तसेच पाणपोईची व्यवस्था केली. देसाईगंज पंचायत समिती व ग्रामसेवकांच्या वतीने मंडप, मॅट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. नगर परिषद देसाईगंज, तिरूपती विद्यालय कोकडी, कृषी सहायक सुधाकर कोहळे यांनी पाणपोई उभारली. ग्रामीण रुग्णालय देसाईगंज व प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूडच्या वतीने आरोग्यसेवा पुरविण्यात आली. औषधीसाठी लागणारी मासोळी कोकडी येथील भोई बांधवांनी उपलब्ध करून दिली. औषधी वाटपासाठी कोकडी येथील ग्राम सुरक्षा दल सदस्य, युवकवर्ग, शिक्षक, कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. गर्दीचा प्रचंड त्रास कोकडीवासीयांना सहन करावा लागत असला तरी सेवाभावाची भावना येथील नागरिकांच्या मनात अजूनही कायम असल्याने या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे आदरातिथ्य केले जाते, हे विशेष.उद्घाटनीय कार्यक्रमाला माजी खा. नाना पटोले, आ. कृष्णा गजबे, माजी आ. आनंदराव गेडाम, देसाईगंज पं.स. चे सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, जि.प. सदस्य रोशनी पारधी, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड. संजय गुरू, १९१ सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, माजी सभापती पसराम टिकले, नाना कांबळे, भूषण खंडाते, सरपंच सुधीर वाढई, उपसपंच वीरघरे, पोलीस पाटील पुरूषोत्तम कापगते, तंमुस अंध्यक्ष रामू सहारे, माजी सरपंच मंसाराम बुद्धे आदी उपस्थित होते.कोकडीसाठी सोयी द्यागेल्या ३८ वर्षांपासून कोकडीत दमाग्रस्तांना औषधी देण्याची निस्वार्थ सेवा प्रल्हाद कावळे व गावकरी करीत आहेत. या कार्यात परिसरातील अनेक मच्छीमार बांधव अहोरात्र सेवा देतात. पण शासन इतर संस्थांना ५-५ कोटी देत असताना या मानवतेच्या कार्यासाठी शासन कोणत्याही सोयी करीत नाही, अशी खंत माजी खा.नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :medicineऔषधं