शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:13 IST

पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देवैरागड, नागेपल्ली, आलापल्ली येथे चोरी : सुमारे चार लाख रूपयांचा ऐवज लंपास, सुट्यांमध्ये साधली संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.आलापल्ली : गोंड मोहल्ला येथील निवासी प्रदीप शामराव घुटे यांच्या घरी अज्ञात इसमांनी घरफोडी करून दोन चांदीच्या मुर्त्या, तीन ड्रेस, तीन टॉवेल, लॅपटॉप असा ऐवज ९ सप्टेंबरच्या रात्री चोरून नेला. नागेपल्ली आंबेडकर वार्डात चोरांनी एकाच रात्री तीन घरे फोडली. यामध्ये पुष्पा भडके यांच्या घरातील आलमारी फोडून पाच ग्रॅम अंगठी, पाच हजार रूपये व मोबाईल, टॅब असा एकूण २० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. देवराव अलाम यांच्या घरातील आलमारी फोडून सहा हजार रूपयांची रोकड लंपास केली. विवेक घुमे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फुटला नाही. तेथून चोरटे पसार झाले. यामुळे आंबेडकर वार्डात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांच्या घरी चोरी झाली ते सर्व परगावी गेले होते. गावावरून परत आल्यानंतर घटना उघडकीस आली. परिचारिका तलांडे यांच्या घराचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न झाला. आलापल्ली व नागेपल्ली ही दोन्ही गावे अगदी जवळ आहेत. दोन्ही गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वैरागड : वैरागड येथे मंगळवारी रात्री तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे तीन हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरा वार्डात मध्यरात्रीच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर असलेल्या नलिनी सदाशिव ठाकरे महिलेच्या घराचा दरवाजा तोडून तिच्या घरातील दोन लाख रूपये रोख व सोने असा एकूण २ लाख ५० हजार रूपयांच ऐवज लंपास केला आहे. याच वार्डातील मुख्य रस्त्यावर असलेल्या प्रमोद तावेडे यांच्या किराणा दुकानाचे दार तोडून दुकानात असलेले दोन हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याच बरोबर शिक्षक कॉलनीतील अजय नागमोती यांच्या घराचे दार तोडून रोकड व सोने असा एकूण ३६ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर याबाबतची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक राठोड घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकही आणण्यात आले होते. मात्र काहीच फायदा झाला नाही. चोरीतील बहुतांश गुन्हेगार पकडले जात नाही. त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढत चालली आहे. चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Thiefचोर